शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

विकास आराखड्यावर विशेष सभेत गोपनीय चर्चा; सभागृह परिसरात प्रवेशबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 00:13 IST

नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.

नवी मुंबई : प्रशासनाने सर्वसाधारण सभेमध्ये मांडलेल्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभागृह परिसरात पत्रकारांसह नागरिकांनाही बंदी घातली होती. रात्री १० वाजेपर्यंत सभेचे कामकाज सुरू होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या सर्व सभांचे व विशेष सभांचे कामकाज पाहण्यासाठी पत्रकारांसह नागरिकांनाही प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रवेश दिला जातो; परंतु या सभेसाठी कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. प्रेक्षक गॅलरी, पत्रकारकक्षाकडे कोणी जाऊ नये यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

विकास आराखड्यास महासभेने मंजुरी दिल्यानंतर सूचना व हरकती मागविण्यासाठी तो प्रसिद्ध केला जाणार आहे. तेव्हा तो सर्वांना उपलब्ध होणार असून, तोपर्यंत तो गोपनीय ठेवण्यासाठी कोणालाही प्रवेश देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. बेलापूर ते दिघापर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये आराखड्यामध्ये कशाचा समावेश आहे याची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात आली. नगरसेवकांनी या आराखड्यामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये काय हवे त्याविषयी सूचना मांडल्या.

प्रत्येक नोडमध्ये मैदान, उद्यान, आरोग्य व इतर सुविधांसाठी भूखंडांचे आरक्षण आहे का? याविषयी नगरसेवक दक्ष असल्याचे पाहावयास मिळाले. रस्ता रुंदीकरणासह इतर अनेक प्रकारच्या सूचना या वेळी करण्यात आल्या. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आराखड्यामध्ये त्यांच्या पद्धतीने सूचना केल्या. विकास आराखड्यामध्ये सिडकोच्या अनेक भूखंड सामाजिक सुविधांसाठी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली. कोणत्या भूखंडावर काय आरक्षण असावे हेही सूचित करण्यात आले.

रात्री १० वाजेपर्यंत सभेचे कामकाज सुरू होते. या सभेनंतर नगरसेवकांची समिती नियुक्ती केली जाणार आहे. आराखड्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्यानंतर त्या हरकतींचे निराकरण ही समिती करणार आहे. यानंतर आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.महापालिका क्षेत्राच्या भविष्याचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. बैठकीमधील चर्चा गोपनीय राहवी, यासाठी सभेसाठी नगरसेवकांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. महासभेच्या मंजुरीनंतर विकास आराखड्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत.- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र