शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी शिल्पे दुर्लक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:38 IST

देखभालीसाठी यंत्रणाच नाही; सिडकोसह महानगरपालिकेची कंजुषी; नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

- नामदेव मोरे नवी मुंबई : सिडकोसह नवी मुंबई महानगरपालिकेने शहर सुशोभीकरणासाठी अनेक ठिकाणी शिल्पे उभारली आहेत. रेल्वे स्टेशन, बसस्थानकासह उद्यानांमध्ये कारंजे व कृत्रिम धबधबेही तयार केले आहेत; परंतु त्यांची देखभाल करण्यासाठी यंत्रणाही उभी केली नाही व खर्च करण्यातही कंजुषी केली जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.देशातील सातव्या व राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेनेही वाटचाल सुरू झाली आहे. प्रथम सिडको व नंतर महानगरपालिकेने शहरातील विकासकामे करण्याबरोबर शहर सुशोभीकरणावरही लक्ष दिले आहे. २००५ मध्ये सिडकोने विशेष कार्यशाळेचे आयोजन करून नवी मुंबईच्या वैभवात भर टाकतील अशी शिल्पे तयार करून घेतली होती. कार्यशाळेतून तयार झालेली शिल्पे महामार्ग, रेल्वे स्टेशन व इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आली. १३ वर्षांमध्ये या कलाकृतींचे नक्की काय झाले याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. दुर्लक्षित स्थितीमध्ये ही शिल्पे असून त्यांच्या सभोवती कचरा पडला आहे. अनेक ठिकाणी झुडपे वाढली आहेत. प्रशासन काहीच लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिल्पे तयार करताना व बसविताना शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या कलाकृती अडगळीत पडल्या आहेत. वाशी रेल्वे स्टेशनची इमारत आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क म्हणून ओळखली जाते. रेल्वे स्टेशनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे यासाठी समोरील बाजूला भव्य कारंजे उभारण्यात आले होते; परंतु १५ वर्षांपासून ते बंद अवस्थेमध्ये असून त्याची देखभाल करण्याकडे लक्ष दिले जात नाही.सिडकोने जुईनगर व नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरही कारंजे बसविले होते. नेरूळमध्ये दगडांचा वापर करून आकर्षक शिल्प तयार केले होते. शहराची निर्मिती असे त्याचे स्वरूप होते; परंतु सद्यस्थितीमध्ये त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून शहराचे शिल्पकार म्हणविणारे त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. खारघर पुलाखाली असलेले शिल्पही दुर्लक्षित असून त्याची देखभाल केली जात नाही.महानगरपालिकेनेही अडीच दशकांच्या वाटचालीमध्ये सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. वाशीतील शिवाजी चौक, सेक्टर १७, नेरूळ पश्चिमेकडील बसस्थानक व इतर अनेक ठिकाणी शिल्पे व कारंजे तयार केली आहेत; पण त्यांची देखभाल केली जात नाही. अनेक ठिकाणी कारंजे बंद अवस्थेमध्येच आहेत. प्रत्येक वर्षी स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करायचे व अभियान संपताच पुन्हा शहर अस्वच्छतेमध्ये भर टाकायची असे प्रकार सुरू आहेत.शहराची प्रतिमा मलीनमहानगरपालिका व सिडको सुशोभीकरणावर प्रचंड खर्च करते. शिल्प, कारंजे तयार केले जातात; परंतु त्यांची देखभाल करण्यासाठी खर्च करताना कंजुषी केली जाते. नागरिकांनी आवाज उठविला की तात्पुरती दुरुस्ती केली जाते. सद्यस्थितीमध्ये अडगळीत पडलेली शिल्पे व बंद कारंजामुळे शहराची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे.‘फिफा’साठीचा खर्चही व्यर्थ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेचे काही सामने नेरुळमध्ये खेळविण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महापालिकेने शहर सुशोभीकरणासाठी प्रचंड खर्च केला. पामबीच रोडवर वाशीमध्ये व उरण फाटा ते मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर वंडर्स पार्कजवळ फुटबॉलची प्रतिकृती तयार करून परिसरात हिरवळ लावली होती. यामधील वाशीतील हिरवळ कधीच गायब झाली असून तेथे झुडपे वाढली आहेत. फुटबॉलवर धूळ साचली आहे. नेरुळमधील हिरवळीचीही योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही.उत्सव चौकाप्रमाणे देखभाल हवीसिडकोने खारघरमध्ये भव्य उत्सव चौक उभारला आहे. नुकतीच त्याची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली आहे. तेथील शिल्प पाहून शहरवासी व बाहेरून येणाऱ्या नागरिकांनीही समाधान व्यक्त केले असून, याच धर्तीवर नवी मुंबई व पनवेल परिसरामधील इतर शिल्प व चौकांचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई