शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी शिल्पे दुर्लक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:38 IST

देखभालीसाठी यंत्रणाच नाही; सिडकोसह महानगरपालिकेची कंजुषी; नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

- नामदेव मोरे नवी मुंबई : सिडकोसह नवी मुंबई महानगरपालिकेने शहर सुशोभीकरणासाठी अनेक ठिकाणी शिल्पे उभारली आहेत. रेल्वे स्टेशन, बसस्थानकासह उद्यानांमध्ये कारंजे व कृत्रिम धबधबेही तयार केले आहेत; परंतु त्यांची देखभाल करण्यासाठी यंत्रणाही उभी केली नाही व खर्च करण्यातही कंजुषी केली जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.देशातील सातव्या व राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेनेही वाटचाल सुरू झाली आहे. प्रथम सिडको व नंतर महानगरपालिकेने शहरातील विकासकामे करण्याबरोबर शहर सुशोभीकरणावरही लक्ष दिले आहे. २००५ मध्ये सिडकोने विशेष कार्यशाळेचे आयोजन करून नवी मुंबईच्या वैभवात भर टाकतील अशी शिल्पे तयार करून घेतली होती. कार्यशाळेतून तयार झालेली शिल्पे महामार्ग, रेल्वे स्टेशन व इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आली. १३ वर्षांमध्ये या कलाकृतींचे नक्की काय झाले याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. दुर्लक्षित स्थितीमध्ये ही शिल्पे असून त्यांच्या सभोवती कचरा पडला आहे. अनेक ठिकाणी झुडपे वाढली आहेत. प्रशासन काहीच लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिल्पे तयार करताना व बसविताना शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या कलाकृती अडगळीत पडल्या आहेत. वाशी रेल्वे स्टेशनची इमारत आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क म्हणून ओळखली जाते. रेल्वे स्टेशनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे यासाठी समोरील बाजूला भव्य कारंजे उभारण्यात आले होते; परंतु १५ वर्षांपासून ते बंद अवस्थेमध्ये असून त्याची देखभाल करण्याकडे लक्ष दिले जात नाही.सिडकोने जुईनगर व नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरही कारंजे बसविले होते. नेरूळमध्ये दगडांचा वापर करून आकर्षक शिल्प तयार केले होते. शहराची निर्मिती असे त्याचे स्वरूप होते; परंतु सद्यस्थितीमध्ये त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून शहराचे शिल्पकार म्हणविणारे त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. खारघर पुलाखाली असलेले शिल्पही दुर्लक्षित असून त्याची देखभाल केली जात नाही.महानगरपालिकेनेही अडीच दशकांच्या वाटचालीमध्ये सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. वाशीतील शिवाजी चौक, सेक्टर १७, नेरूळ पश्चिमेकडील बसस्थानक व इतर अनेक ठिकाणी शिल्पे व कारंजे तयार केली आहेत; पण त्यांची देखभाल केली जात नाही. अनेक ठिकाणी कारंजे बंद अवस्थेमध्येच आहेत. प्रत्येक वर्षी स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करायचे व अभियान संपताच पुन्हा शहर अस्वच्छतेमध्ये भर टाकायची असे प्रकार सुरू आहेत.शहराची प्रतिमा मलीनमहानगरपालिका व सिडको सुशोभीकरणावर प्रचंड खर्च करते. शिल्प, कारंजे तयार केले जातात; परंतु त्यांची देखभाल करण्यासाठी खर्च करताना कंजुषी केली जाते. नागरिकांनी आवाज उठविला की तात्पुरती दुरुस्ती केली जाते. सद्यस्थितीमध्ये अडगळीत पडलेली शिल्पे व बंद कारंजामुळे शहराची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे.‘फिफा’साठीचा खर्चही व्यर्थ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेचे काही सामने नेरुळमध्ये खेळविण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महापालिकेने शहर सुशोभीकरणासाठी प्रचंड खर्च केला. पामबीच रोडवर वाशीमध्ये व उरण फाटा ते मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर वंडर्स पार्कजवळ फुटबॉलची प्रतिकृती तयार करून परिसरात हिरवळ लावली होती. यामधील वाशीतील हिरवळ कधीच गायब झाली असून तेथे झुडपे वाढली आहेत. फुटबॉलवर धूळ साचली आहे. नेरुळमधील हिरवळीचीही योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही.उत्सव चौकाप्रमाणे देखभाल हवीसिडकोने खारघरमध्ये भव्य उत्सव चौक उभारला आहे. नुकतीच त्याची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली आहे. तेथील शिल्प पाहून शहरवासी व बाहेरून येणाऱ्या नागरिकांनीही समाधान व्यक्त केले असून, याच धर्तीवर नवी मुंबई व पनवेल परिसरामधील इतर शिल्प व चौकांचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई