शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील आरोग्य सेवा कोलमडली; सर्वसामान्य रुग्णांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 00:34 IST

सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

नवी मुंबई : सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. औषधांचा तुटवडा, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आदींमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याचा परिणाम म्हणून मागील काही महिन्यांपासून रुग्णांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेकडे पाठ फिरविल्याने रुग्णालये ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.नवी मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी शंभर खाटांची दोन रुग्णालये, ३00 खाटांचे एक प्रथम संदर्भ रुग्णालय, तीन माता बाल रुग्णालये व २१ नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शहरवासीयांना आरोग्य सेवा पुरविली जाते. या सेवेसाठी अर्थसंकल्पात २00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी मागील काही महिन्यापासून संबंधित विभागातील अधिकाºयांच्या गलथान कारभाराचा फटका या विभागाला बसला आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. दवाखाने आणि नागरी आरोग्य केंद्रात डॉक्टर्स आणि कर्मचाºयांची कमतरता भासू लागली आहे. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची परवड होत आहे. वाशी येथील ३00 खाटांचे प्रथमसंदर्भ रुग्णालयात नवी मुंबईसह मुंबई, रायगड आणि शेजारच्या ठाणे शहरातील गरजू रुग्ण येतात. मात्र मागील काही महिन्यापासून येथील रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.अतिदक्षता विभागात डॉक्टर्स नसल्याने रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे अत्यवस्थेतील रुग्णांना तासनतास रुग्णालयाच्या प्रतीक्षागृहात पडून राहावे लागत आहे. बाह्य रुग्णांचेही हाल होत आहेत. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करायला सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्या रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे. याचा परिणाम म्हणून रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तीनशे खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात आजमितीस हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच रुग्ण दाखल असल्याचे दिसून येते. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयासह शहरातील महापालिकेच्या सर्वच आरोग्य सेवा कोलमडल्या आहेत.महापालिका प्रशासनाने १ मे रोजी प्रसिद्धिपत्रक काढून वाशीतील महापालिका रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरू झाल्याचे स्पष्ट केले होते; परंतु अद्याप येथील कामकाज सुरळीत झालेले नाही. रुग्णालयामध्ये वैद्यकशास्त्र तज्ज्ञांची कमतरता असल्यामुळे नवीन रुग्णांना भरती करता येत नाही. सद्यस्थितीमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दोन ते तीन रुग्ण उपचार घेत आहेत. ट्रॉमा केअर युनिटमध्ये ५ रुग्ण आहेत. पुरुष मेडिकल विभागामध्ये ३० बेडची क्षमता असताना येथे एकही रुग्ण नाही. महिला विभागामध्ये २५ बेडची क्षमता असलेला महिला विभागात सुध्दा शुकशुकाट असल्याचे दिसून आले आहे. उपचारासाठी येणाºया रुग्णांना डॉक्टर नसल्याचे सांगून इतर ठिकाणी जाण्यास सांगितले जात आहे. यामुळे शहरातील गरीब वस्तीमधील रुग्णांना नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागत आहे. उपचारासाठी सुरू असलेल्या धावपळीमुळे प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयामध्ये जावे लागत असून कर्ज काढून उपचार करावे लागत आहेत. महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात यापूर्वी रुग्णांसाठी जागाही उपलब्ध होत नव्हती. अनेक वेळा जमिनीवर बेड ठेवून रुग्णांवर उपचार करावे लागत होते.३00 बेडच्या रुग्णालयामध्ये जेमतेम १५० रुग्णांवरच उपचार करावे लागत आहेत. अतिदक्षता विभाग, ट्रॉमा केअर, पुरुष व महिला विभागामधील बेड मोकळे आहेत. डॉक्टर नसल्याने रुग्णांना सेवा देता येत नाही.दोन वर्षांत केवळ दोन कोटींची औषध खरेदीमहापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी २00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मागील दोन वर्षात फक्त दोन कोटी रुपयांचीच औषधे खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे आवश्यक असलेल्या चारशे औषधांपैकी केवळ शंभर ते दीडशे औषधांचीच खरेदी केल्याचे उघड झाले आहे. औषध खरेदीला बगल देणाºया संबंधित अधिकाºयांची सखोल चौकशी झाली पाहिजे, असा सर्वसामान्य नागरिकांचा सूर आहे.महापालिका करणार २0 कोटींची औषध खरेदीआरोग्य सुविधांचा उडालेला बोजवारा, त्यासंदर्भात वाढत्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी तातडीने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. विविध कारणांमुळे आरोग्य सेवा पुरविण्यात निर्माण झालेल्या अडचणीचा त्यांना आढावा घेतला. तसेच अत्यावश्यक औषधांची तूट भरून काढण्यासाठी तातडीने २0 कोटींची औषध खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.लोकप्रतिनिधींची उदासीनताप्रशासनाच्या धोरणात्मक निर्णयावर गळा काढून ओरडणाºया लोकप्रतिनिधींनी मात्र या प्रश्नांबाबत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. कारण मागील पाच सहा महिन्यांपासून आरोग्य सेवा कोलमडली आहे.या विषयावर एकाही नगरसेवकाने प्रशासनाला धारेवर धरल्याचे ऐकिवात नाही. विरोधकांसह सत्ताधाºयांनी सुध्दा या विषयावर चुप्पी साधल्याने नवी मुंबईकरांची आरोग्य सुविधा रामभरोसेझाली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल