शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

शहरातील आरोग्य सेवा कोलमडली; सर्वसामान्य रुग्णांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 00:34 IST

सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

नवी मुंबई : सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. औषधांचा तुटवडा, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आदींमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याचा परिणाम म्हणून मागील काही महिन्यांपासून रुग्णांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेकडे पाठ फिरविल्याने रुग्णालये ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.नवी मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी शंभर खाटांची दोन रुग्णालये, ३00 खाटांचे एक प्रथम संदर्भ रुग्णालय, तीन माता बाल रुग्णालये व २१ नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शहरवासीयांना आरोग्य सेवा पुरविली जाते. या सेवेसाठी अर्थसंकल्पात २00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी मागील काही महिन्यापासून संबंधित विभागातील अधिकाºयांच्या गलथान कारभाराचा फटका या विभागाला बसला आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. दवाखाने आणि नागरी आरोग्य केंद्रात डॉक्टर्स आणि कर्मचाºयांची कमतरता भासू लागली आहे. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची परवड होत आहे. वाशी येथील ३00 खाटांचे प्रथमसंदर्भ रुग्णालयात नवी मुंबईसह मुंबई, रायगड आणि शेजारच्या ठाणे शहरातील गरजू रुग्ण येतात. मात्र मागील काही महिन्यापासून येथील रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.अतिदक्षता विभागात डॉक्टर्स नसल्याने रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे अत्यवस्थेतील रुग्णांना तासनतास रुग्णालयाच्या प्रतीक्षागृहात पडून राहावे लागत आहे. बाह्य रुग्णांचेही हाल होत आहेत. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करायला सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्या रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे. याचा परिणाम म्हणून रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तीनशे खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात आजमितीस हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच रुग्ण दाखल असल्याचे दिसून येते. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयासह शहरातील महापालिकेच्या सर्वच आरोग्य सेवा कोलमडल्या आहेत.महापालिका प्रशासनाने १ मे रोजी प्रसिद्धिपत्रक काढून वाशीतील महापालिका रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरू झाल्याचे स्पष्ट केले होते; परंतु अद्याप येथील कामकाज सुरळीत झालेले नाही. रुग्णालयामध्ये वैद्यकशास्त्र तज्ज्ञांची कमतरता असल्यामुळे नवीन रुग्णांना भरती करता येत नाही. सद्यस्थितीमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दोन ते तीन रुग्ण उपचार घेत आहेत. ट्रॉमा केअर युनिटमध्ये ५ रुग्ण आहेत. पुरुष मेडिकल विभागामध्ये ३० बेडची क्षमता असताना येथे एकही रुग्ण नाही. महिला विभागामध्ये २५ बेडची क्षमता असलेला महिला विभागात सुध्दा शुकशुकाट असल्याचे दिसून आले आहे. उपचारासाठी येणाºया रुग्णांना डॉक्टर नसल्याचे सांगून इतर ठिकाणी जाण्यास सांगितले जात आहे. यामुळे शहरातील गरीब वस्तीमधील रुग्णांना नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागत आहे. उपचारासाठी सुरू असलेल्या धावपळीमुळे प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयामध्ये जावे लागत असून कर्ज काढून उपचार करावे लागत आहेत. महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात यापूर्वी रुग्णांसाठी जागाही उपलब्ध होत नव्हती. अनेक वेळा जमिनीवर बेड ठेवून रुग्णांवर उपचार करावे लागत होते.३00 बेडच्या रुग्णालयामध्ये जेमतेम १५० रुग्णांवरच उपचार करावे लागत आहेत. अतिदक्षता विभाग, ट्रॉमा केअर, पुरुष व महिला विभागामधील बेड मोकळे आहेत. डॉक्टर नसल्याने रुग्णांना सेवा देता येत नाही.दोन वर्षांत केवळ दोन कोटींची औषध खरेदीमहापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी २00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मागील दोन वर्षात फक्त दोन कोटी रुपयांचीच औषधे खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे आवश्यक असलेल्या चारशे औषधांपैकी केवळ शंभर ते दीडशे औषधांचीच खरेदी केल्याचे उघड झाले आहे. औषध खरेदीला बगल देणाºया संबंधित अधिकाºयांची सखोल चौकशी झाली पाहिजे, असा सर्वसामान्य नागरिकांचा सूर आहे.महापालिका करणार २0 कोटींची औषध खरेदीआरोग्य सुविधांचा उडालेला बोजवारा, त्यासंदर्भात वाढत्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी तातडीने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. विविध कारणांमुळे आरोग्य सेवा पुरविण्यात निर्माण झालेल्या अडचणीचा त्यांना आढावा घेतला. तसेच अत्यावश्यक औषधांची तूट भरून काढण्यासाठी तातडीने २0 कोटींची औषध खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.लोकप्रतिनिधींची उदासीनताप्रशासनाच्या धोरणात्मक निर्णयावर गळा काढून ओरडणाºया लोकप्रतिनिधींनी मात्र या प्रश्नांबाबत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. कारण मागील पाच सहा महिन्यांपासून आरोग्य सेवा कोलमडली आहे.या विषयावर एकाही नगरसेवकाने प्रशासनाला धारेवर धरल्याचे ऐकिवात नाही. विरोधकांसह सत्ताधाºयांनी सुध्दा या विषयावर चुप्पी साधल्याने नवी मुंबईकरांची आरोग्य सुविधा रामभरोसेझाली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल