शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

इको फ्रेंडली मूर्तींकडे मंडळांची पाठ; पर्यावरणाला दुय्यम स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 00:04 IST

शाडूच्या मातीऐवजी पीओपीच्या मूर्तींनाच प्राधान्य

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पर्यावरणाच्या अनुषंगाने शाडूच्या मूर्तीला प्राधान्य देणे आवश्यक असतानाही गणेशोत्सव मंडळांकडून पीओपीच्या मूर्तींचाच वापर होताना दिसत आहे. त्यामागे मंडळांमध्ये सुरू असलेल्या मूर्तीच्या उंचीच्या स्पर्धेचे कारण स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे प्रशासनाकडून मंडळांना मूर्तीच्या अनुषंगानेही सक्तीच्या अटी व शर्ती घालण्याची गरज भासत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात यंदा सुमारे २५ हजार घरगुती तर ५०० सार्वजनिक मंडळांकडून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव साजरा होत असताना इको फ्रेंडली मूर्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन प्रतिवर्षी पालिकेसह पोलिसांकडून केले जाते. तलावातील तसेच खाडी व समुद्रातील पाण्याचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी या सूचना केल्या जातात. त्यानंतरही मंडळांकडून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींना प्राधान्य मिळत असल्याचे सार्वजनिक तसेच घरगुती मंडळांच्या पाहणीत दिसून येत आहे.

यावरून गणेशभक्तांकडून उत्सव साजरा केला जात असताना पर्यावरणाच्या मुद्याला बगल दिली जात आहे. परिणामी तलावांमध्ये तसेच खाडीत प्रदुषण वाढल्याचे पुढील काही दिवसात पहायला मिळते. असे प्रकार टाळण्यासाठी पालिकेने पर्यायी तलावांमध्ये गॅबियन वॉल बांधून तलावांचे विभाजन केले आहे. परंतु मंडळांमध्ये शाडूच्या मूर्तीला अथवा इतर पर्यायी मूर्तींचा वापर करण्यासंदर्भात जागरूकता करण्यात प्रशासनात उणिवा जाणवत आहेत.

पीओपीच्या गणेशमूर्तीला मंडळांकडून प्राधान्य मिळण्यामागे त्यांच्यात मूर्तीच्या उंचीवरून सुरू असलेल्या स्पर्धेचे कारण ठळकपणे दिसत आहे. परिणामी उत्सवातले सामाजिक भान हरपत असून, केवळ दिखाव्यासाठी चढाओढ केली जात आहे. त्याकरिता मुंबई,पेणसह इतर ठिकाणावरून मूर्ती आणल्या जात आहेत. मागील काही वर्षात शहरातील प्रत्येक नोडमध्ये मंडळांच्या संख्येत वाढ झालीआहे. चढाओढीच्या स्पर्धेतून कोपरखैरणे, नेरुळ, ऐरोली तसेच इतर नोडमध्ये अवघ्या १०० ते ५०० मीटर अंतरावर गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे. त्या सर्वांकडून मूर्ती आकर्षक तसेच अधिकाधिक सर्वाधिक उंचीची असावी याकरिता पीओपीच्या मूर्तींना प्राधान्य मिळत आहे. त्यात पालिकेच्या तसेच पोलिसांच्या स्पर्धेत सहभाग घेवून पारितोषिके मिळवणाऱ्या मंडळांचाही समावेश आहे. तर मागील वर्षापासून प्लॅस्टिक बंदी लागू झाल्याने, केवळ इको फ्रेंडली देखावे तयार केले जावू लागले आहेत. त्यांच्याकडूनच इको फ्रेंडली मूर्तीला मात्र नापसंती मिळत आहे.सार्वजनिक तसेच सोसायट्यांमधील सुमारे ५०० गणेशोत्सव मंडळांपैकी अवघ्या ८ ते १० मंडळांकडून इको फ्रेंडली मूर्तींचा वापर करण्यात आलेला आहे. पूर्णपणे कागदापासून अथवा शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींचा त्यांच्याकडून वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये नेरुळच्या भीमाशंकर सार्वजनिक उत्सव मंडळ, ऐरोलीतील सुयोग गणेशोत्सव मंडळ, कोपरखैरणेतील शिवशंभो मित्र मंडळ, सानपाडा येथील नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ आदी मंडळांचा समावेश आहे. उर्वरित मंडळांमध्ये शाडूच्या मूर्ती वापरण्याबाबत जनजागृतीची गरज आहे.मंडळांकडून स्पर्धेच्या अट्टाहासापोटी जादा उंचीच्या मूर्तींना महत्त्व दिले जात आहे. कोपरखैरणे परिसरात हे चित्र अधिक पहायला मिळत आहे. अवघ्या दहा ते बारा फूट रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा तीन ते चार मजली घरे आहेत. त्यापैकी अनेकांनी वरच्या भागात बाहेरच्या बाजूला बांधकामे वाढवलेली आहेत. यामुळे तिथल्या मंडळांकडून अरुंद गल्ली बोळातून १२ ते १५ फुटाच्या मूर्तींची आगमन व विसर्जनाची मिरवणूक होत असताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय जागोजागी लटकणाºया केबल तसेच विद्युत वायरींमुळेही धोका उद्भवत आहे. यानंतरही मंडळांमध्ये त्याचे गांभीर्य व पर्यावरणपूरक मूर्तींना महत्त्व याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019