शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

तिखट मिरची झाली गोड; भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा

By नामदेव मोरे | Published: April 12, 2024 7:28 PM

आंध्र प्रदेशसह कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आवक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उन्हाचा तडाखा वाढू लागल्यापासून गृहिणींची वर्षभर लागणारी चटणी व इतर वस्तू बनविण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरचीचे दर जवळपास निम्यावर आल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, तिखट मिरची गोड झाल्याची भावना गृहिणींमधून व्यक्त होत आहे.

 मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५० ते ६० टन मिरचीची आवक होत आहे. गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील हंगाम जवळपास संपला असून, आता आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणामधून मिरची विक्रीसाठी येत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरचीचे दर कमी असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळू लागला आहे. गतवर्षी बेडगी मिरचीचे दर प्रतिकिलो ५०० ते ७०० रुपये होते. यावर्षी हेच दर २५० ते २५० रुपयांवर आले आहेत. तेजाचे दर २०० ते ३०० वरून २२० ते २३० रुपये किलो झाले आहेत. काश्मीरी मिरचीचे दर ६५० ते ८०० रुपये किलोवरून ३५० ते ५०० रुपये किलोवर आले आहेत. दर कमी झाल्यामुळे गृहिणींचीही वर्षभराची चटणी तयार करण्यासाठी लगबग सुरू असून, प्रत्येक डंकावर मिरची कुटून घेण्यासाठी गर्दी झालेली दिसत आहे.

        बाजार समितीमध्ये मिरचीचा हंगाम जवळपास संपत आला असला तरी मे महिन्यापर्यंत ग्राहकांकडून मागणी राहणार असून, यावर्षी दर कमीच राहतील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

गतवर्षी उत्पादन कमी असल्यामुळे बाजारभाव वाढले होते. यावर्षी मिरचीचे दर कमी असून, ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सद्य:स्थितीमध्ये दक्षिणेकडून राज्यांमधून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.-अमरीश बरोत, व्यापारी प्रतिनिधी, मसाला मार्केटधने, हळद, तेज पत्त्याची तेजी सुरूचमिरचीचे दर कमी झाले असले तरी इतर मसाल्यांच्या दरामध्ये मात्र वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये हळदीचे दर प्रतिकिलो १४० ते २१० रुपये होते. आता हळद होलसेल मार्केटमध्ये १६० ते २२० रुपये किलो दराने विकली जात आहे. धने ६० ते १४० वरून ९० ते १७० रुपये, दगडफूल २८० ते ४०० वरून ३०० ते ४५० रुपये, काळी मिरी ६०० ते ८५० वरून ६५० ते ९५० रुपये व तेज पत्ता ३९ ते ५५ वरून ४५ ते ९० रुपये किलोवर पाेहोचले आहेत.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती