शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मृत्युदर कमी करण्याचे आव्हान; नव्या आयुक्तांच्या कार्यप्रणालीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:15 AM

आतापर्यंत ३४३ जणांचा बळी

नवी मुंबई : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शनिवारपर्यंत ११,४२८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७,२१३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक असले, तरी मृतांचा आकडा मात्र धडकी भरविणारा आहे. कारण कोरोनामुळे मृतांचा आकडा ३५0च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान महापालिकेचे नवनियुक्त अभिजीत बांगर यांच्यासमोर समोर आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बांगर काय भूमिका घेतात, याकडे सध्या शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेला अपयश आल्याचा ठपका ठेवून आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच दुसऱ्या दिवशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोविड रुग्णालयात अ‍ॅन्टीजेन चाचणी सुरू केली आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी जलद होऊन बाधित रुग्णांवर लगेच उपचार सुरू करणे शक्य होणार आहे, तसेच या कोविड रुग्णालयातील पहिल्या १००० खाटा आॅक्सिजन बेडमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, १०० आयसीयू खाटा निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन विविध प्रवर्गातील सुमारे पाच हजार पदांची भरती करण्यात येणार असून, त्यासंबंधीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूणच पदभार स्वीकारताच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बांगर यांनी उचललेली पावले दिलासा देणारी असल्याने शहरवासीयांनी काही प्रमाणात सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. असे असले, तरी नव्या आयुक्तांसमोर सध्या मृत्युदर कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. कारण शनिवारी कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. च्रविवारी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर नवी मुंबईतील मृतांची एकूण संख्या ३४३ इतकी झाली आहे. त्यामुळे मृत्यूचा दर कमी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई