शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

एपीएमसीमधील मतांवर उमेदवारांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 23:54 IST

मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांसह व्यापारी, वाहतूकदार व इतर घटक मिळून तब्बल सव्वा लाख नागरिकांना रोजगार मिळाला आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांसह व्यापारी, वाहतूकदार व इतर घटक मिळून तब्बल सव्वा लाख नागरिकांना रोजगार मिळाला आहे. निवडणुकीमध्ये अनेक मतदार संघांमध्ये येथील नागरिकांची भूमिका निर्णायक ठरत असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी व उमेदवारांनी या परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. रॅलींसह बैठकांचे प्रमाणही वाढले आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. वर्षाला ७ ते ८ हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच मार्केटमधून होत आहे. २५ हजारपेक्षा जास्त माथाडी कामगार, रोजंदारीवर काम करणारे १० हजारपेक्षा जास्त कामगार याठिकाणी काम करत आहे. जवळपास दहा हजार व्यापारी, त्यांच्याकडे काम करणारे मेहता कर्मचारी व इतर मदतनीस, ५ हजारपेक्षा जास्त वाहतूकदार, हजारो खरेदीदार, हॉटेल व इतर स्टॉल्स व मार्केटवर अवलंबून असलेल्यांची संख्या जवळपास सव्वा लाख आहे. प्रमुख आर्थिक केंद्र असलेली बाजार समिती महत्त्वाचे राजकीय केंद्रही बनले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ७ पेक्षा जास्त नगरसेवक एपीएमसीशी संबंधित आहेत. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, जुन्नर मतदार संघाचे आमदार शरद सोनावणे यांचे कार्यक्षेत्रही एपीएमसी आहे. माजी आमदार व सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे कार्यक्षेत्रही याच ठिकाणी आहे. मसाला व धान्य मार्केटमधील व्यापारी व संघटनांचे पदाधिकारी यांचे भाजपासह विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे चांगले संबंध आहे. ठाणे, सातारा, शिरुरसह अनेक लोकसभा मतदार संघामध्ये बाजार समितीमधील व्यापारी व कामगारांची मते निर्णायक ठरत आहेत. येथील काही कामगार व व्यापारी ग्रामीण भागामध्ये त्यांच्या गावचे प्रतिनिधित्व करत आहेत. फक्त मतदार म्हणून नाही तर कार्यकर्ते म्हणून येथील कामगारांची व इतर घटकांची भूमिका निर्णायक ठरू लागली आहे.बाजार समितीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाल्यामुळे विविध पक्षाच्या नेत्यांनी बाजार समितीमध्ये संपर्क वाढविला आहे. सातारा, शिरुर मतदार संघामधील उमेदवारांनी येथील कार्यकर्त्यांना ‘गावाकडे चला’चे आवाहन केले आहे. व्यापारी व कामगार सर्वांनीच निवडणुकीपर्यंत जेवढा शक्य होईल तेवढा वेळ प्रचारासाठी द्यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे व राष्ट्रवादी काँगे्रसचे आनंद परांजपे यांनीही बाजार समितीमधील विविध घटकांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांची मते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.।शिवसेनेने काढली रॅलीसोमवारी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी बाजार समितीमधील भाजी, फळ, कांदा-बटाटा व इतर मार्केटमधून रॅली काढली. येथील कामगारांसह व्यापाऱ्यांशी संवाद साधला. सर्वांच्या समस्या समजून घेवून सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नवी मुंबईमधील पदाधिकारी व नगरसेवकही उपस्थित होते.>राष्ट्रवादी काँगे्रसचीही रॅलीमंगळवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार आनंद परांजपे भाजी, फळ व कांदा -बटाटा मार्केटला भेट देणार आहेत. येथील सर्व घटकांशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक विंगमध्ये जावून व्यापारी व कामगारांची भेट घेणार आहेत. याशिवाय मार्केटशी संबंधित इतर घटकांशीही संवाद साधणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.>‘गावाकडे चला’चे आवाहनमाथाडी नेते व शिवसेनेचे सातारा मतदार संघाचे उमेदवार नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँगे्रसचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, शिरुर मतदार संघामधील शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी यांनीही बाजार समितीमधील कामगारांसह व्यापाऱ्यांना गावाकडे चलाचे आवाहन केले आहे. निवडणुकीमध्ये फक्त मतदार म्हणून नाही तर कार्यकर्ते म्हणून काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.>उलट-सुलट प्रतिक्रियामुंबई बाजार समितीसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शासनाच्या धोरणांचा फटका येथील कामगार व व्यापाºयांना बसू लागला आहे. व्यापार टिकविण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी काहीच प्रयत्न न करणारेही काही नेते निवडणुकांच्या काळात मार्केटमध्ये येवून आश्वासनांचा पाऊस पाडतात. अशांविषयी व्यापाºयांसह कामगारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. जे नेहमीच मदतीला येतात त्यांनाच साथ द्या, असे आवाहनही केले जात आहे.