शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याचे आमिष फसवणूक करणारी टोळी सक्रिय

By नामदेव मोरे | Updated: April 2, 2024 17:41 IST

सावध राहण्याचे अध्यक्षांचे आवाहन.

नामदेव मोरे, नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून २४ तासांत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या काही व्यक्ती सक्रिय आहेत. त्यामुळे गरजूंची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा ठकसेनांपासून सावध राहण्याचे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले आहे. फसवणूक करणाऱ्यांविरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना उद्योग उभारण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. गरजूंना बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. कर्जावर महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा देण्यात येतो. महामंडळाच्या सर्व योजना ऑनलाइन आहेत. नागरिकांना सहकार्य करता यावे, यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. जिल्हानिहाय मेळावे घेऊनही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येते. हजारो तरुणांनी या महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु, सद्यस्थितीमध्ये महामंडळातून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे.

फसवणूक करणारे दलाल हे अण्णासाहेब पाटील व महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा फोटो फेसबूक व व्हॉट्सॲप डीपी, स्टेटसला ठेवत आहेत. महामंडळातून २४ तासात कर्ज मिळवून दिले जाईल, असे आश्वासन देण्यात येत आहे. प्रोसेसिंगच्या बहाण्याने पैसे मागविले जात आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडल्यास नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. फसवणुकीचे काही प्रकार निदर्शनास आले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. अशा ठकसेनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

महामंडळातून २४ तासात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे तत्काळ कर्ज कोणतीही बँक देत नाही. खोटे आमिष दाखविणाऱ्यांपासून सावध राहावे, अशा व्यक्तींविरोधात सायबर सेलकडे तक्रार करण्यात येणार आहे - नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

महामंडळाचा ८२,२९० नागरिकांना लाभ -

महामंडळाने आतापर्यंत तब्बल ८२,२९० नागरिकांना उद्योग उभारण्यासाठी बँकांच्या माध्यमातून ६३,७१ कोटी १४ लाख रुपये कर्ज मिळवून दिले आहे. यापैकी ६६,६८१ नागरिकांना व्याज परतावा देण्यात आला आहे. आतापर्यंत ६८१ कोटी रुपये व्याज परतावा देण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस