शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

करंजा बंदराचा व्यवसायिकांनी वापर सुरू करावा, मच्छीमार संस्थेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:03 IST

१३ वर्षांपूर्वी या बंदराचा खर्च ६४ कोटी रुपये होता.मात्र कामाला झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बंदराच्या खर्चात अडीच पटीने वाढला असून १५० कोटींपर्यंत पोहोचला आहे.

मधुकर ठाकूर

उरण : मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी १५० कोटी रुपये खर्चून रखडत-रखडत उभारण्यात येत असलेल्या करंजा मच्छीमार बंदर मच्छीमारांनी वापर करण्याचा निर्णय करंजा मच्छीमार संस्थेने घेतला  आहे. त्यामुळे या अत्याधुनिक करंजा बंदराचा वापर राज्यातील सर्वच मच्छीमार व मासळी व्यवसायिकांनी करण्याचे आवाहन करंजा मच्छीमार सहकारी संस्थेच्यावतीने अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केले आहे.  राज्यातील मासळी व्यावसायिक व मच्छीमारांसाठी पकडलेली मासळी बंदरात उतरवणे, खरेदी-विक्री, लिलाव, आयात-निर्यात करण्यासाठी मुंबईतील ससुनडॉक व कसारा या दोनच बंदरांचा पर्याय उपलब्ध आहे.यापैकी भाऊचा धक्का जवळील कसारा बंदर हे पुर्णपणे फक्त गुजराती मच्छीमारांसाठी वापरण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो मच्छीमारांसाठी उरलेल्या एकमेव ससुनडॉक बंदराचाच आधार आहे.मात्र सुमारे ७०० ते ७५० क्षमतेचे ससुनडॉक बंदर मच्छीमारांसाठी अपुरे पडत असल्याने ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊन १३ वर्षांपुर्वी करंजा येथील बंदरात १००० मच्छीमार बोटींच्या क्षमतेचे अत्याधुनिक सर्व सोयी सुविधांयुक्त नवीन बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.

१३ वर्षांपूर्वी या बंदराचा खर्च ६४ कोटी रुपये होता.मात्र कामाला झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे बंदराच्या खर्चात अडीच पटीने वाढला असून १५० कोटींपर्यंत पोहोचला आहे. या वाढलेल्या खर्चाची केंद्र व राज्य सरकारने अर्धी-अर्धी म्हणजेच ७५-७५ कोटी जबाबदारी उचलली असून त्यानंतरच निधी अभावी रखडलेल्या करंजा मच्छीमार बंदराच्या कामाला सुरुवात झाली आहे.मात्र त्यानंतरही बंदराचे काम अद्यापही रखडत- रखडत सुरू आहे.त्यानंतरही जेट्टीची उंची दीड -दोन फुटांपर्यंत वाढविण्यासाठी आणखी काही कोटींच्या निधीची कमतरता भासत आहे.बंदर कार्यान्वित करण्याच्या अनेक घोषणाही झाल्या.मात्र बंदराचे काम ठेकेदाराला दंड ठोठावण्यात आल्यानंतरही हलगर्जीपणामुळे अद्यापही अनेक कामे पुर्णत्वास गेलेले नाहीत.आणखी किती कालावधी लागेल याचीही माहिती नाही.

त्यामुळे बंदरांतील कामे पूर्ण झाली नसतानाही केवळ मच्छीमारांच्या हित लक्षात घेत करंजा मच्छीमार सहकारी संस्थेने करंजा मच्छीमार बंदरातुनच आगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून  कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच मासळी व्यावसायिक व मच्छीमारांसाठी पकडलेली मासळी बंदरात उतरवणे, खरेदी-विक्री, लिलाव, आयात-निर्यात करण्यासाठी या बंदराचा वापर करण्याचे आवाहन करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केले आहे. दरम्यान महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने बंदराचे काम काही अंशी झाले नसल्याने अद्यापही तरी करंजा मच्छीमार बंदर मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात दिले नसल्याची माहिती बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfishermanमच्छीमार