शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदा महामार्ग घेणार ४ हजार झाडांचा बळी; ७०६ झाडांचे होणार पुनर्रोपण, वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी

By नारायण जाधव | Updated: May 12, 2023 21:47 IST

राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सहाव्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे...

नवी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीचे सरकार येताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या स्वप्नातील मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासह बहुचर्चित मुंबई- बडोदा महामार्गाच्या कामाने वेग पकडला आहे. यानुसार बुलेट ट्रेन आणि महामार्गाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ४,२५३ वृक्षांची तोड होणार असून ७७६ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सहाव्या बैठकीत ही मंजुरी दिली आहे. यातील पालघरच्या मोरीवली, वेवूर, नावाळी आणि घोलविरा गावाच्या हद्दीतील ज्या ६८१ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे, त्याबाबतचा प्रस्ताव नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन आणि पालघर नगर परिषदेने वृत्तपत्रात यासंबंधीची जाहिरात न देताच पाठवला होता. यामुळे तो तूर्तास परत पाठवून वृत्तपत्रात जनतेच्या माहितीसाठी जाहिरात देऊन परत पाठविण्यास सांगण्यात आले आहे.

या ठिकाणच्या वृक्षांची होणार कत्तल -१- मुंबई- बडोदा महामार्गाच्या कामात वसई- विरार महापालिकेच्या हद्दीतील २९ हेरिटेज वृक्षांसह १,६९८ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. या वृक्षांचे आयुष्यमान २०,७७५ वर्षे असल्याने त्या बदल्यात तितकीच झाडे लावण्यास वृक्ष प्राधिकरणाने नॅशनल हायवे प्राधिकरणास सांगितले आहे.२ - मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात वसई- विरार महापालिकेच्या हद्दीतील नऊ हेरिटेज वृक्षांसह १,३६८ वृक्षांची कत्तल होणार आहे. त्यांचे सरासरी आयुष्यमान १४,५८६ वर्षे असल्याने तितकीच झाडे लावण्यास नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनला सांगितले आहे.३ - मुंबई- बडोदा महामार्गाच्या कामात कुळगाव- बदलापूरच्या आमने ते भोज सेक्शनमधील १,२८५ झाडे बाधित होणार आहेत. यापैकी ५०६ झाडे कायमची ताेडावी लागणार आहेत. तर ७७६ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. या वृक्षांचे आयुष्यमान २१,३६६ वर्षे असल्याने त्या बदल्यात तितकीच झाडे लावण्यास वृक्ष प्राधिकरणाने नॅशनल हायवे प्राधिकरणास सांगितले आहे.

पुनर्रोपित ५६ हजार वृक्षांचे जिओ टॅगिंग सक्तीचेराज्य वृक्ष प्राधिकरण समितीने या वृक्ष कत्तलीस मंजुरी देताना बाधित वृक्षांच्या आयुष्यमानानुसार ज्या एकूण ५६,७२७ वृक्षांची लागवड करण्यास सांगितले आहे, त्या वृक्षांच्या रोपांची उंची कमीतकमी सहा फूट असणे आवश्यक आहे. तसेच पुनर्रोपित सर्व झाडांचे जिओ टॅगिंग करून त्यांचे सात वर्षांपर्यंत संवर्धन करण्याचे निर्देश राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने दिले आहेत. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMumbaiमुंबईGujaratगुजरात