शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

रखडलेल्या धरणांमुळे नैनासह रायगडच्या विकासाला ब्रेक

By admin | Updated: March 22, 2017 01:36 IST

देशातील सर्वात वेगाने विकसित होणारा जिल्हा म्हणून रायगडची ओळख निर्माण झाली आहे. सिडकोचा नैना प्रकल्प, आंतरराष्ट्रीय

नामदेव मोरे / नवी मुंबईदेशातील सर्वात वेगाने विकसित होणारा जिल्हा म्हणून रायगडची ओळख निर्माण झाली आहे. सिडकोचा नैना प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देशभरातील गुंतवणूकदारांनी या परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे; पण विकासाच्या गती व त्यासाठी पाणीपुरवठा योजना यांची योग्य सांगड घालता आली नसल्याने रायगडच्या विकासाला ब्रेक लागला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कोंढाणे, बाळगंगा प्रकल्प ठप्प आहेत. नदींचे नाल्यात रूपांतर झाले असून विहिरी व तलावांच्या रक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात गंभीर परिणाम या परिसरातील नागरिकांना भोगावे लागण्याची शक्यता आहे. जेएनपीटी या देशातील सर्वात मोठ्या बंदराबरोबर सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ या परिसरात होत आहे, यामुळे संपूर्ण देशाचेच याकडे लक्ष लागले आहे. नैनाच्या पहिल्या टप्प्यात २७० पैकी २३ गावांचाच आराखडा तयार करण्यात आला. त्यामधील एकाही नोडचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रखडलेल्या या कामांमुळे नैना परिसराचा व त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याच्या विकासावर दुरगामी परिणाम होऊ लागला आहे. नैना क्षेत्रातील ठप्प झालेल्या कामांविषयी अनेक कारणे सांगितली जात असली, तरी खरे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित होणाऱ्या शहराला पाणीपुरवठा कसा करायचा हेच आहे. नैना परिसराच्या विकासासाठी शासनाची व सिडकोची पूर्ण भिस्त १८०५ कोटी रुपयांचा बाळगंगा प्रकल्प, १ हजार कोटींचा कोंढाणे प्रकल्प व १५० कोटी रुपयांच्या हेटवणे प्रकल्पावर होती; पण तीनही प्रकल्पांचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. पाणीच नसल्याने विकासाची गती कमी करावी लागली आहे. या परिसरात काळुंद्री, कासाडी, गाढी व इतर नद्यांचेही नाल्यात रूपांतर झाले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात तलाव व विहिरी आहेत; पण या नैसर्गिक स्रोतांचे रक्षण करण्यात अपयश येत असून, फसलेल्या पाणी नियोजनाचा परिणाम विकासावर होऊ लागला आहे.