शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

कळंबोली जलधारण तलावाच्या जवळ पुन्हा बायोमेडिकल वेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:42 IST

नऊ महिन्यांनंतर ही दुसरी घटना असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल-सायन महामार्गाच्या अगदी बाजूला असलेल्या सिडकोच्या पाणी साठवून ठेवणाऱ्या धारण तलावा लगत पुन्हा बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात आले आहे. नऊ महिन्यांनंतर ही दुसरी घटना असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. अज्ञात व्यक्तीकडून वारंवार औषधे उघड्यावर फेकली जात आहे. यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकंकडून होत आहे.औषधी व घातक कचरा रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी टाकला जात नाही. त्याची विल्हेवाट अतिशय योग्य प्रकारे लावावी लागते. माणसाच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणासाठीही हा कचरा धोकादायक असतो. त्यामध्ये औषध आणि दवाखान्यात वापरलेले सलाइन, सुया, सिरिंज, हँड ग्लोव्ज, शिवाय इतर गोष्टींचा सामावेश आहे. हा कचरा हा वेगळा करणे बंधनकारक आहे. तशा अटीवरच हॉस्पिटल, छोटे दवाखाने यांना तालुका आरोग्य विभाग करून परवानगी दिली जाते. महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडूनही बायोमेडिकल वेस्ट हा वेगळा करण्याबाबत सूचना त्या रुग्णालयाबरोबरच, मेडिकल आणि औषध कंपन्यांना दिल्या जातात. पनवेल आणि सिडको कॉलनीमध्ये अनेक दवाखाने आहेत, तसेच मेडिकल आणि रक्त लघवी तपासणी बरोबरच एक्स-रे, एमआरआय, सिटीस्कॅन, सोनोग्राफी केंद्राचा समावेश असतो. वेगवेगळ्या रुग्णांचे आॅपरेशन या ठिकाणी केली जातात. त्यासाठी उपकरणे वापरली जातात. यापैकी वापरलेल्या वस्तू, तसेच औषध आणि वापरायोग्य नसलेल्या इतर मेडिकल अनेकदा रस्त्यावर आणि सार्वजनिक भागात फेकून दिले जाते.बायोमेडिकल वेस्ट उचलण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे काम देण्यात आले आहे. या कंपनीची गाडी दररोज पनवेल परिसरात येते आणि बायोमेडिकल वेस्ट होऊन जाते. त्याबाबत नोंदवह्या ठेवण्यात येतात, तसेच या कचºयाची वाहतूक, तसेच त्याचे डिस्पोजल करण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला पैसे द्यावे लागतात. ते वाचविण्याकरिता काही रुग्णालये, मेडिकल्स आणि औषधे, गोळ्या आणि इतर मेडिकल वस्तू रस्त्यावर फेकून देतात.धारण तलावात वारंवार टाकला जातो कचराकळंबोलीत सेक्टर ३ ई येथे, तसेच केएलई कॉलेजच्या समोर पावसाचे पाणी साठवून ठेवणारा जलधारण तलाव आहे. येथे सोमवारी बायोमेडिकल वेस्ट म्हणजेच औषधांचे सात ते आठ बॉक्स टाकून देण्यात आले आहे. त्यामध्ये औषधे, लिक्विड, हँड ग्लोव्ज आणि इतर गोळ्यांचा समावेश आहे. या आगोदर २८ नोव्हेंबर, २०१९ रोजी, त्यानंतर ४ जानेवारी, २०२० रोजी हा कचरा टाकण्यात आला होता.याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसारित करताच पालिका कर्मचारी या जागेची साफसफाई करतात. पुन्हा काही महिने गेल्यानंतर याच ठिकाणी परत औषधे, गोळ्या, हातमोजे, इंजेक्शन, सुया आणून टाकल्या जातात. टाकणाºयावर कारवाई मात्र होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई