शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईतही, ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 6:59 AM

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायींवरील हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. नवी मुंबईत ठिकठिकाणी रास्ता रोको करून, तसेच मोर्चे काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

नवी मुंबई : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायींवरील हल्ल्याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. नवी मुंबईत ठिकठिकाणी रास्ता रोको करून, तसेच मोर्चे काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनता असुरक्षित असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.तुर्भे येथील संतप्त जमावाने ठाणे-बेलापूर मार्गावर टायर पेटवून रास्ता रोको केला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी आंदोलनाची भूमिका ठरवण्यासाठी ऐरोली येथे विविध राजकीय संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर ऐरोलीत आरपीआयच्या वतीने मोर्चा काढून नवी मुंबई बंदची घोषणा करण्यात आली. दरम्यान, एक ते दोन दुकानांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. तर रबाळे येथे काहींनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको केला. चिंचपाडा येथे रस्त्यावर उतरलेल्या जमावाने ठाणे-बेलापूर मार्ग अडवून धरला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त जमावाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये पोलिसांच्या गस्ती वाहनाची काच फुटल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तुर्भे नाका येथील पुलाखाली जमलेल्या महिला व पुरुषांच्या जमावाने त्या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.कामोठेत दुकाने बंदकामोठेत मंगळवारी सायंकाळी जमावाकडून घोषणाबाजी करीत दुकाने बंद ठेवण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी जमलेल्या जमावास समज देऊन वातावरण शांत केले. जमावाने क्रांतीचौक, उस्मानपुरा ते पीर बजार रस्त्यावरील दुकाने बंद केली. टी.व्ही.सेंटर, येथे सुमारे हजारो लोकांचा जमाव रस्त्यावर आला. त्यांनी परिसरातील भाजीपाल्याची दुकाने आणि हातगाड्या पालथ्या केल्या. यामुळे लहान-मोठ्या दुकानदारांमध्ये तणाव निर्माण झाला. जयभवानीनगर येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरवर दगडफेक करून प्रवेशद्वाराच्या काचा फोडण्यात आल्या. त्रिमूर्ती चौक, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, येथील दुकानाच्या काचा फोडण्यात आल्या.शहरात चोख पोलीस बंदोबस्तभीमा कोरेगाव या ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद पनवेलमधील काही भागात उमटल्याचे मंगळवारी पाहावयास मिळाले. विविध संघटनांनी निषेध नोंदविण्यासाठी पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कळंबोली या ठिकाणी निदर्शन केली. या वेळी कायदा सुरक्षा राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पनवेल बंदची हाकरायगड रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांनी बुधवारी पनवेल बंदची हाक दिली. नागरिकांनी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवावा, असे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी पनवेल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.आंदोलनादरम्यान कायदा हातात घेतल्याने एनआरआय, रबाळे व रबाळे एमआयडीसी येथे चार गुन्हे दाखल आहेत. बुधवारीही शहरात चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी शांतता राखावी. कायदा मोडल्यास कारवाई केली जाईल.- डॉ. सुधाकर पठारे,पोलीस उपआयुक्त 

टॅग्स :newsबातम्या