शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ख्रिसमस, नवीन वर्षानिमित्त घारापुरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहा; पोलिसांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 22:57 IST

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील असलेल्या जागतिक लेणी पाहण्यासाठी दररोज देश विदेशातून हजारो पर्यटक येतात.

मधुकर ठाकूर -

उरण : जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर लेणी पाहण्यासाठी ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षानिमित्त देश-विदेशातून हजारो पर्यटक येत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी बेटावर शुक्रवारी (२३) विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही, यासाठी उपाययोजना म्हणून सर्वच विभागानी सज्ज राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील असलेल्या जागतिक लेणी पाहण्यासाठी दररोज देश विदेशातून हजारो पर्यटक येतात. त्यातच ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व सरत्या वर्षानिमित्त येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते. सणासुदीत बेटावर येणाऱ्या हजारोंच्या संख्येने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (२३) विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलविण्यास आली होती. मोरा सागरी पोलिस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्व विभागाच्या हाॅलमध्ये झालेल्या बैठकीत विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. 

यामध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या एलिफंटा विभागाचे उप बंदर निरिक्षक विनायक करंजे, एलिफंटा सिक्युरिटी गार्डचे प्रमुख अजय झा व त्यांचे सहकारी, गेटवे जलवाहतूक संस्थेचे प्रतिनिधी,ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकुर, सदस्य  सचिन लाड, सदस्या नीता ठाकुर, भारती पांचाळ, अरुणा घरत, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर,माजी उपसरपंच सचिन म्हात्रे, व्यावसायिक तथा जेष्ठ नागरिक यशवंत म्हात्रे,लोकल गाईडचे प्रतिनिधी कृष्णा भोईर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व सरत्या वर्षानिमित्त बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या दुपटीने वाढते.त्यामुळे सुरक्षेयंत्रणेसह बेटावरील कार्यरत असलेल्या सर्वच शासकीय विभागांवर अतिरिक्त ताण वाढतो. त्यामुळे बेटावर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या देशी विदेशी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. तैनात असलेल्या सुरक्षा यंत्रणेसह अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तर सर्वच शासकीय विभागांची पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चांगलीच तारांबळ उडते. यावर बेटावर कार्यरत असलेल्या सर्वच विभागाने यावेळी बेटावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना करण्यावल चर्चा झाली. त्यावर उपाययोजना म्हणून सर्वच विभागाने सतर्क राहावे असे आवाहन वपोनि औदुंबर पाटील यांनी केले. यावर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी सज्ज असल्याचे सांगितले.

यावेळी माजी उपसरपंच सचिन म्हात्रे यांनी आयोजित महत्त्वाची बैठक यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. 

 

टॅग्स :ChristmasनाताळPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई