शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोणत्याही पक्षात राहा, पण ओबीसींच्या प्रश्नांसाठी एकत्र या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:34 IST

कृतज्ञता मेळावा; छगन भुजबळ यांचे ओबीसी नेत्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ओबीसी नेत्यांनी कोणत्याही पक्षात राहावे; पण समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी येथे केले. २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसीची जनगणना झाली पाहिले, अशी मागणी करून  समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.   

नवी मुंबईमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ओबीसी कृतज्ञता मेळावा झाला. छगन भुजबळ म्हणाले की, देशात समाजाची ५४ टक्के लोकसंख्या आहे. समाजाला २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. शरद  पवार यांनी देशात सर्वप्रथम मंडल आयोग स्वीकारला. त्यांनी नेहमीच ओबीसींचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. ओबीसी नेते विविध पक्षांमध्ये काम करत आहेत. पक्ष कोणताही असू द्या समाजाच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. समाजाच्या प्रश्नांसाठी लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, असा आग्रह धरला. देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्याची ताकद समाजामध्ये आहे. संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही राष्ट्रवादी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे राज राजापूरकर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, राजू शिंदे, संदीप सुतार, जी. एस. पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. 

...तर रोजगारासाठी भटकावे लागेलजितेंद्र आव्हाड यांनी वेदांता व इतर उद्योग गुजरातला गेल्यावरून सरकारवर टीका केली. उद्योगांचे असेच स्थलांतर होत राहिले तर महाराष्ट्रातील तरुणांना उत्तर प्रदेश, बिहार प्रमाणे राज्यातील तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यात जावे लागेल, असे मतही व्यक्त केले. 

तरुणांचा रोजगार हिसकावलाआमदार रोहित पवार यांनी वेदांतासह अनेक कंपन्या गुजरातला गेल्या. गुजरातच्या हितासाठी बुलेट ट्रेनचा आग्रह धरला जात आहे. उद्योगांच्या स्थलांतरामुळे तरुणांच्या हक्काचा रोजगार हिसकावला असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळOBC Reservationओबीसी आरक्षणJitendra Awhadजितेंद्र आव्हाड