शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

सावध रहा, संयम बाळगा, दंगल घडविण्याचा प्रयत्न करतील; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

By नामदेव मोरे | Updated: November 20, 2023 23:15 IST

१ डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण; माझा जीव गेला तरी आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे न हटण्याचा निर्धार

नवी मुंबई: मराठा समाजाला आरक्षण भेटणारच आहे. लढाई निर्णायक टप्यावर आली आहे. काहीजण दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतील.  पण संयम बाळगा, सावध रहा आपणास शांततेने लढा द्यायचा आहे. माझा जीव गेला तरी चालेल पण आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. १ डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. २४ डिसेंबर ला आरक्षण दिले नाही तर मुंबईत धडक देण्याचा इशाराही दिला.

 नवी मुंबईतील घणसोली येथे सकल मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन केले होते. सर्व मराठा बांधवांनी निर्णायक लढ्यात योगदान द्यावे. घरोघरी जाऊन जनजागृती करावी. आरक्षणाची फाईल सरकारच्या टेबलावर आहे. २४ डिसेंबर ला आरक्षण मिळणार आहे. सरकारने मुदतीत आरक्षण दिले नाही तर २५ डिसेंबर ला पुढील लढ्याची दिशा ठरविली जाईल. आम्हाला मुंबई ला यायचे नाही. पण निर्णय झाला नाही तर आम्हाला मुंबईत यावे लागेल. मंत्रालय बघायला लागेल. येथे लय विमाने उडतात. आम्हाला विमाने बघावी लागतील असा इशाराही दिला.

  मराठा आरक्षणाच्या आड जो येईल त्याला सुट्टी नाही. पण आता लढा शेवटच्या टप्यात आला असल्याने सगळ्यांनी  संयम बाळगावा. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचे आहे. छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्याचे वय झालय त्याला किंमत देऊ नका. दंगल फडकविण्याची भाषा करणारांपासून सावध रहा. हा काय काय खातो आम्हाला माहिती आहे. मुंबईत कधी आला,काय खाल्ले कुठे खाल्ले माहिती आहे. एकदा आरक्षणाचा प्रश्न सुटू द्या मग त्याच्याकडे पाहू असेही स्पष्ट केले. ओबीसी व मराठे एकदिलाने राज्यात रहात आहेत.त्यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.  पण आता आपण शांततेने लढा सुरू ठेवायचा. कुठेही शांतता भंग होऊ द्यायची नाही. माझ शरीर थकलय. पण आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हीपण जागे रहा. घराघरात जनजागृती करा असे आवाहन ही केले. मराठा समाज ओबीसीत गेल्यात जमा आहे. म्हणून काहीजण भांडणे लावत आहेत.पण  संयम धरा लढाई आपणच जिंकणार आहोत असे स्पष्ट केले.

आरक्षणापासून वंचित कोणी ठेवले.

मराठा समाजाने सर्वांवर विश्वास ठेवला पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. यापुढे आरक्षणापासून कोणी वंचित ठेवले ते पण तपासू. सर्व मराठा समाजाचा फायदा होईल आरक्षण मिळेल असा कायदा हवा.ज्यामध्ये मराठ्यांचे हित नाही तो कायदा मान्य नाही असेही स्पष्ट केले.

दहा हजार मोबाईल चा प्रकाश 

सभेला उपस्थित नागरिकांना मोबाईल चा प्रकाश पाडण्याचे आवाहन केले.  एक क्षणात दहा हजार मोबाईल च्या प्रकाशाने मैदान उजळून निघाले