शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

सावध रहा, संयम बाळगा, दंगल घडविण्याचा प्रयत्न करतील; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

By नामदेव मोरे | Updated: November 20, 2023 23:15 IST

१ डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण; माझा जीव गेला तरी आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे न हटण्याचा निर्धार

नवी मुंबई: मराठा समाजाला आरक्षण भेटणारच आहे. लढाई निर्णायक टप्यावर आली आहे. काहीजण दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतील.  पण संयम बाळगा, सावध रहा आपणास शांततेने लढा द्यायचा आहे. माझा जीव गेला तरी चालेल पण आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. १ डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. २४ डिसेंबर ला आरक्षण दिले नाही तर मुंबईत धडक देण्याचा इशाराही दिला.

 नवी मुंबईतील घणसोली येथे सकल मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन केले होते. सर्व मराठा बांधवांनी निर्णायक लढ्यात योगदान द्यावे. घरोघरी जाऊन जनजागृती करावी. आरक्षणाची फाईल सरकारच्या टेबलावर आहे. २४ डिसेंबर ला आरक्षण मिळणार आहे. सरकारने मुदतीत आरक्षण दिले नाही तर २५ डिसेंबर ला पुढील लढ्याची दिशा ठरविली जाईल. आम्हाला मुंबई ला यायचे नाही. पण निर्णय झाला नाही तर आम्हाला मुंबईत यावे लागेल. मंत्रालय बघायला लागेल. येथे लय विमाने उडतात. आम्हाला विमाने बघावी लागतील असा इशाराही दिला.

  मराठा आरक्षणाच्या आड जो येईल त्याला सुट्टी नाही. पण आता लढा शेवटच्या टप्यात आला असल्याने सगळ्यांनी  संयम बाळगावा. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचे आहे. छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्याचे वय झालय त्याला किंमत देऊ नका. दंगल फडकविण्याची भाषा करणारांपासून सावध रहा. हा काय काय खातो आम्हाला माहिती आहे. मुंबईत कधी आला,काय खाल्ले कुठे खाल्ले माहिती आहे. एकदा आरक्षणाचा प्रश्न सुटू द्या मग त्याच्याकडे पाहू असेही स्पष्ट केले. ओबीसी व मराठे एकदिलाने राज्यात रहात आहेत.त्यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.  पण आता आपण शांततेने लढा सुरू ठेवायचा. कुठेही शांतता भंग होऊ द्यायची नाही. माझ शरीर थकलय. पण आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हीपण जागे रहा. घराघरात जनजागृती करा असे आवाहन ही केले. मराठा समाज ओबीसीत गेल्यात जमा आहे. म्हणून काहीजण भांडणे लावत आहेत.पण  संयम धरा लढाई आपणच जिंकणार आहोत असे स्पष्ट केले.

आरक्षणापासून वंचित कोणी ठेवले.

मराठा समाजाने सर्वांवर विश्वास ठेवला पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. यापुढे आरक्षणापासून कोणी वंचित ठेवले ते पण तपासू. सर्व मराठा समाजाचा फायदा होईल आरक्षण मिळेल असा कायदा हवा.ज्यामध्ये मराठ्यांचे हित नाही तो कायदा मान्य नाही असेही स्पष्ट केले.

दहा हजार मोबाईल चा प्रकाश 

सभेला उपस्थित नागरिकांना मोबाईल चा प्रकाश पाडण्याचे आवाहन केले.  एक क्षणात दहा हजार मोबाईल च्या प्रकाशाने मैदान उजळून निघाले