शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : विमानतळाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:42 IST

- नामदेव मोरेनवी मुंबई - दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळासाठी प्राथमिक तयारी त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्या निधनामुळे रायगडसह विमानतळ विकासाचे स्वप्न पाहणारे द्रष्टे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना ...

- नामदेव मोरेनवी मुंबई - दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळासाठी प्राथमिक तयारी त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्या निधनामुळे रायगडसह विमानतळ विकासाचे स्वप्न पाहणारे द्रष्टे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.१८ फेब्रुवारी २०१८ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली. या वेळी पंतप्रधानांनी विमानतळाच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण वाढू लागल्यामुळे १९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न पाहण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. वाजपेयी यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारू लागले आहे. भविष्याचा वेध घेऊन त्यांनी नवी मुंबई विमानतळासाठीची प्राथमिक तयारी सुरू केली होती. २००४ मध्ये वाजपेयी सरकार सत्तेवर असतानाच विमानतळासाठी सीआरझेड अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली होती व व नवी मुंबईमधील ग्रीनफिल्ड एअरपोर्टसाठी महत्त्वाची परवानगीही मिळाली होती. यामुळे नवी मुंबईमध्ये वाजपेयी प्रत्यक्षात महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी आले नसले तरी विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाची चाचपणी त्यांच्याच कार्यकाळात झाली होती. वाजपेयी यांनी पाहिलेले विमानतळाचे स्वप्न राज्यात व देशात भाजपाची सत्ता असतानाच प्रत्यक्ष साकार होऊ लागले असून, वेगाने विमानतळ उभारणीची कामे सुरू झाली आहेत. ३ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. या वेळी त्यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधीची घोषणाही केली होती. मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर भाजपाचीच सत्ता असताना रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील विमानतळ व दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या संवर्धनाचे स्वप्न पाहणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआडगेल्यामुळे मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.देशाच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांनी आयुष्यभर देशहिताचा विचार केला व देशाला प्रगतिपथावर नेणारे अनेक निर्णय घेतले. चारित्र्यसंपन्न व कवी मनाचे नेतृत्व हरपले असून, देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.- मंदा म्हात्रे,आमदार, बेलापूर मतदार संघदेशाच्या प्रगतीमध्ये अतुलनीय योगदान देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्यासोबत आमच्या वडिलांनी प्रत्यक्षात काम केले आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशहिताचा विचार करणाऱ्या नेतृत्वाने अखेरचा श्वास घेतला असल्यामुळे देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.- सुरेश हावरे,अध्यक्ष, शिर्डी साई संस्थानराजकारणामध्ये अनेक तपे कार्यरत राहूनही मनाची संवेदनशीलता त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही. ‘जय जवान व जय किसान’ची व्याप्ती त्यांनी ‘जय विज्ञान’पर्यंत नेली. देशाला महासत्ता बनविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले असून, त्यांच्या जाण्याने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.- प्रशांत ठाकूर,आमदार, पनवेलस्वातंत्र्यापासूनच्या सर्वात चांगल्या व देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणाºया पंतप्रधानांमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश आहे. त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या मृत्यूमुळे देश द्रष्ट्या नेतृत्वाला मुकला आहे.- जयवंत सुतार,महापौर, नवी मुंबई महापालिकाअटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान व एकूणच राजकीय वाटचालीमध्ये केलेले काम अतुलनीय आहे. त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांचे कार्य भविष्यातही प्रेरणा देत राहील.- मारुती भोईर,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपाअटलबिहारी वाजपेयी देशाचे महानेते होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी खर्ची केले. विरोधी पक्षात असतानाही तत्कालीन पंतप्रधानांनी युनायटेड नेशनमध्ये देशाची बाजू मांडण्यासाठी त्यांना पाठविले होते.- सतीश निकम,जिल्हा सरचिटणीस भाजपा

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNavi Mumbaiनवी मुंबई