शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

ऐरोलीतील राजदूतावासाचा प्रकल्प रद्द; अपेक्षित प्रतिसाद नाही, ९ वर्षांपूर्वी केली होती घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 4:17 AM

सिडकोने २00८ मध्ये ऐरोली येथे आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पाची घोषणा केली होती; परंतु या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

- कमलाकर कांबळे ।

नवी मुंबई : सिडकोने २00८ मध्ये ऐरोली येथे आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पाची घोषणा केली होती; परंतु या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दूतावासासाठी नियोजित केलेल्या जागेवर दुसरा एखादा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे.ऐरोली सेक्टर १0 ए येथे २७.३ हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारण्याचे सिडकोने प्रस्तावित केले होते. या प्रस्तावित प्रकल्पात विविध देशांचे राजदूतावास आणि वकिलातींचा समावेश करण्याची योजना होती. प्रत्येकी २५00 ते ४000 चौ.मी.च्या ३८ भूखंडांवर या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, सुरक्षेसाठी यात ट्रिपल लेअर प्रणाली प्रस्तावित करण्यात आली होती. उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा, दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काहीच अंतरावर हा प्रकल्प असल्याने त्याला विविध देशांतील वाणिज्य दूतावासांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा सुरुवातीला सिडकोला विश्वास वाटत होता. त्यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकल्पात स्टेकहोल्डर होण्यासाठी विविध देशांतील वाणिज्य दूतावासाकडून काही वर्षांपूर्वी प्रस्ताव मागविण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात ४0 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाला भेट दिली होती. सिडकोच्या वतीने विविध देशांच्या या प्रतिनिधींसमोर सादरीकरणही करण्यात आले होते; परंतु त्यापैकी एकाही देशाने या प्रकल्पात दूतावास सुरू करण्याबाबत होकार कळविला नाही. त्यामुळे प्रकल्प नऊ वर्षांपासून केवळ कागदापुरताच मर्यादित राहिला आहे. भविष्यात प्रतिसाद मिळण्याची सूतराम शक्यता नसल्याने हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.ऐरोलीतील नियोजित दूतावासाच्याभूखंडावर अतिक्रमण१आंतरराष्ट्रीय दूतावासाची नऊ वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु या कालावधीत या प्रकल्पाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी ऐरोली येथे आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर अतिक्रमण होताना दिसत आहे.२डेब्रिजमाफियांनी या भूखंडावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले आहे. आणखी काही काळ हा भूखंड असाच मोकळा राहिल्यास भूमाफियांकडून तो गिळंकृत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडकोने राजदूतावासाचा प्रकल्प रद्द करून या भूखंडावर अन्य दुसरा एखादा बहुद्देशीय प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने प्राथमिक स्तरावर कार्यवाही सुरू केल्याचे समजते.