शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गणेश नाईक परिवाराच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 23:22 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेच्या राजन विचारे यांना तब्बल ८४ हजार ८७ मतांची आघाडी मिळाली.

- नामदेव मोरेलोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेच्या राजन विचारे यांना तब्बल ८४ हजार ८७ मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या ऐरोली मतदारसंघातूनही सेनेला ४४,३६३ मतांची आघाडी मिळाली. या निवडणुकीत नवी मुंबईमधील नाईकांचे बालेकिल्ले ढासळले. त्यांचा करिष्मा संपल्याचेच स्पष्ट झाले असून विधानसभा निवडणुकीमध्येही याचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक उमेदवारीच्या स्पर्धेमध्येही नव्हते. पक्षाने त्यांच्याऐवजी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण नाईकांनीही निवडणुकीमधून माघार घेऊन आनंद परांजपे यांच्यावर उमेदवारी लादली. परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी नाईक परिवाराने घेतली होती. गणेश नाईक प्रत्येक सभेमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकणार व नवी मुंबईमधून मोठे मताधिक्य देण्याच्या घोषणा करत होते. परंतु मागील पाच वर्षांमध्ये मतदारांशी संपर्क कमी झाल्यामुळे त्यांचा करिष्मा चाललाच नाही. त्यांच्या बेलापूर मतदार संघामधूनही शिवसेनेला तब्बल ३९,७२४ मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादीला सर्वाधिक अपेक्षा ऐरोली मतदारसंघामधून होती. लोकसभा क्षेत्रामधील सहापैकी या एकाच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विद्यमान आमदार संदीप नाईक दोन वेळा येथून विजयी झाले आहेत. परंतु त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.नवी मुंबई महापालिकेवर नाईक परिवाराची २५ वर्षे सत्ता आहे. यापूर्वी दोन आमदार व एक खासदार, महापौर, पालकमंत्री ही सर्व पदे त्यांच्याच घरामध्ये होती. परंतु सत्ता असताना शहरामधील एफएसआयसह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नसल्यामुळे त्यांना शहरवासीयांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. ऐरोली मतदारसंघामध्ये दोन वेळा संधी मिळूनही आमदार संदीप नाईक यांनाही फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. २०१४ मध्ये येथून राजन विचारेंना २०,४३५ मतांची आघाडी होती. २०१९ मध्ये यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. ही वाढ नाईकांची मतदारसंघावर पकड राहिली नसल्याचे स्पष्ट करणारी आहे. नाईक परिवाराचे वास्तव्य असलेल्या मतदारसंघातही त्यांना मताधिक्य मिळविता आले नाही. यापूर्वीच्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीमधील निकालानंतर नाईक परिवाराने काहीच धडा घेतलेला नाही. शिवसेना व भाजपने मात्र मागील पाच वर्षांत ताकद वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधानपरिषदेचे सभापतीपद दिले. विजय चौगुले यांना वडार समाज समितीचे प्रमुख केल्याचा फायदा युतीला झाला.>विधानसभेवर काय परिणाम?लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराने ऐरोली विधानसभा क्षेत्रामधून तब्बल ४४,३६३ मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघामध्ये भाजपने रमेश पाटील यांना विधानपरिषदेचे सदस्य केले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना महामंडळ व विजय चौगुले यांना वडार समाजाच्या समितीचे अध्यक्ष केले आहे. युतीची ताकद वाढली असून विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.>की फॅक्टर काय ठरला?नाईक परिवाराचा जनसंपर्क कमी झाल्याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसला. संघटनात्मक बांधणी करण्यात व नवमतदारांशी योग्य संवाद ठेवण्यात माजी मंत्री गणेश नाईक व आमदार संदीप नाईकही अपयशी ठरल्याचा फायदा युतीच्या उमेदवाराला झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये एक विधान परिषद सदस्य, महामंडळाचे अध्यक्ष व वडार समाज समितीचे अध्यक्षपद येथील नेत्यांकडे सोपविल्यामुळे युतीची ताकद वाढली. राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे- बेलापूर रोडवर दोन उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग, शिळ - महापे रोडवर एक उड्डाणपूल व इतर विकासकामे मार्गी लावल्याचा फायदाही शिवसेना उमेदवाराला झाला.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९thane-pcठाणे