शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

गणेश नाईक परिवाराच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 23:22 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेच्या राजन विचारे यांना तब्बल ८४ हजार ८७ मतांची आघाडी मिळाली.

- नामदेव मोरेलोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेच्या राजन विचारे यांना तब्बल ८४ हजार ८७ मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या ऐरोली मतदारसंघातूनही सेनेला ४४,३६३ मतांची आघाडी मिळाली. या निवडणुकीत नवी मुंबईमधील नाईकांचे बालेकिल्ले ढासळले. त्यांचा करिष्मा संपल्याचेच स्पष्ट झाले असून विधानसभा निवडणुकीमध्येही याचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक उमेदवारीच्या स्पर्धेमध्येही नव्हते. पक्षाने त्यांच्याऐवजी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण नाईकांनीही निवडणुकीमधून माघार घेऊन आनंद परांजपे यांच्यावर उमेदवारी लादली. परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी नाईक परिवाराने घेतली होती. गणेश नाईक प्रत्येक सभेमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकणार व नवी मुंबईमधून मोठे मताधिक्य देण्याच्या घोषणा करत होते. परंतु मागील पाच वर्षांमध्ये मतदारांशी संपर्क कमी झाल्यामुळे त्यांचा करिष्मा चाललाच नाही. त्यांच्या बेलापूर मतदार संघामधूनही शिवसेनेला तब्बल ३९,७२४ मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादीला सर्वाधिक अपेक्षा ऐरोली मतदारसंघामधून होती. लोकसभा क्षेत्रामधील सहापैकी या एकाच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विद्यमान आमदार संदीप नाईक दोन वेळा येथून विजयी झाले आहेत. परंतु त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.नवी मुंबई महापालिकेवर नाईक परिवाराची २५ वर्षे सत्ता आहे. यापूर्वी दोन आमदार व एक खासदार, महापौर, पालकमंत्री ही सर्व पदे त्यांच्याच घरामध्ये होती. परंतु सत्ता असताना शहरामधील एफएसआयसह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नसल्यामुळे त्यांना शहरवासीयांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. ऐरोली मतदारसंघामध्ये दोन वेळा संधी मिळूनही आमदार संदीप नाईक यांनाही फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. २०१४ मध्ये येथून राजन विचारेंना २०,४३५ मतांची आघाडी होती. २०१९ मध्ये यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. ही वाढ नाईकांची मतदारसंघावर पकड राहिली नसल्याचे स्पष्ट करणारी आहे. नाईक परिवाराचे वास्तव्य असलेल्या मतदारसंघातही त्यांना मताधिक्य मिळविता आले नाही. यापूर्वीच्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीमधील निकालानंतर नाईक परिवाराने काहीच धडा घेतलेला नाही. शिवसेना व भाजपने मात्र मागील पाच वर्षांत ताकद वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधानपरिषदेचे सभापतीपद दिले. विजय चौगुले यांना वडार समाज समितीचे प्रमुख केल्याचा फायदा युतीला झाला.>विधानसभेवर काय परिणाम?लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराने ऐरोली विधानसभा क्षेत्रामधून तब्बल ४४,३६३ मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघामध्ये भाजपने रमेश पाटील यांना विधानपरिषदेचे सदस्य केले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना महामंडळ व विजय चौगुले यांना वडार समाजाच्या समितीचे अध्यक्ष केले आहे. युतीची ताकद वाढली असून विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.>की फॅक्टर काय ठरला?नाईक परिवाराचा जनसंपर्क कमी झाल्याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसला. संघटनात्मक बांधणी करण्यात व नवमतदारांशी योग्य संवाद ठेवण्यात माजी मंत्री गणेश नाईक व आमदार संदीप नाईकही अपयशी ठरल्याचा फायदा युतीच्या उमेदवाराला झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये एक विधान परिषद सदस्य, महामंडळाचे अध्यक्ष व वडार समाज समितीचे अध्यक्षपद येथील नेत्यांकडे सोपविल्यामुळे युतीची ताकद वाढली. राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे- बेलापूर रोडवर दोन उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग, शिळ - महापे रोडवर एक उड्डाणपूल व इतर विकासकामे मार्गी लावल्याचा फायदाही शिवसेना उमेदवाराला झाला.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९thane-pcठाणे