शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

बंदमुळे एपीएमसीमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:14 IST

व्यापाऱ्यांसह कामगारांचा निर्धार : सरकारविरोधात लढा तीव्र करणार; आश्वासन न पाळल्यामुळे असंतोष

नवी मुंबई : शासनाने बाजार समितीमधील माथाडी कामगारांसह व्यापाºयांची फसवणूक केली आहे. पणनमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. बाजार समिती बंद पाडण्याचे षड्यंत्र असून त्या विरोधात तीव्र लढा देण्याचा निर्धार माथाडींसह व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. बंदच्या पहिल्याच दिवशी पाचही मार्केटमध्ये शुकशुकाट होता.

शासनाच्या विरोधात पुकारलेल्या बंदमध्ये बाजार समितीचे कर्मचारी, माथाडी कामगार, व्यापारी व वाहतूकदारांसह सर्व घटक सहभागी झाले होते. धान्य मार्केटमधील बाजार समिती कार्यालयासमोर आयोजित केलेल्या मेळाव्याला दहा हजारपेक्षा जास्त कामगार व व्यापाºयांची उपस्थिती होती. सर्वच वक्त्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र टीका केली. २५ सप्टेंबरला अध्यादेश काढल्यानंतर बाजार समिती बंदचा इशारा दिला होता. यानंतर पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बैठक घेऊन आंदोलन मागे घेण्यात यावे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात बंदच्या पहिल्याच दिवशी विधानसभेमध्ये विधेयक मंजूर करण्यात आले आहे. सरकारने बाजार समितीमधील सर्व घटकांची फसवणूक केली आहे. यामुळे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कामगारांनीही कोणत्याही स्थितीमध्ये माघार घ्यायची नाही असा निर्धार व्यक्त केला. मार्केटमधील सर्व व्यवहार पहिल्याच दिवशी पूर्णपणे बंद करण्यात आले होते. बाजार समितीच्या स्थापनेपासून व्यापारी व कामगारांनी अनेक आंदोलने केली. परंतु प्रथमच भाजी मार्केटसह सर्व मार्केटमधील व्यवहार बंद होते.

चार वर्षांमध्ये सातत्याने बाजार समिती मोडीत काढण्याचे षड्यंत्र सुरू केले आहे. भाजीपाला व फळे नियमनमुक्त करतानाही येथील व्यापारी व कामगारांशी चर्चा करण्यात आली नाही. व्यापाºयांनी सुचविलेल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्केटपुरते मर्यादित करतानाही कोणालाच विश्वासात घेतले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.रोज २००० टन भाजीपाल्याची गरजमुंबई व नवी मुंबईकरांना रोज सरासरी दोन हजार टन भाजीपाला व सहा ते सात लाख जुडी पालेभाज्यांची आवश्यकता असते. सरासरी रोज एक हजार ते १५०० टन कांदा, ८०० ते १५०० टन बटाटा, ५० ते ६० टन लसूणची आवश्यकता असते. ४५० ते ५०० टन गहू, २५०० ते तीन हजार टन तांदूळ व एक हजार टनांपेक्षा जास्त डाळी व कडधान्याची आवक होत असते. बाजार समिती बंद असल्यामुळे मुंबईची अन्न-धान्याची रसद थांबणार आहे.अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही सहभागशासनाच्या विरोधातील आंदोलनामध्ये बाजार समितीमधील अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले होते. बाजार समितीचे कार्यक्षेत्र कमी केल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होणार असून कर्मचाºयांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे व्यापारी व कामगारांच्या बंदमध्ये प्रथमच सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.१०० टनकांदा-बटाटा पडूनकांदा-बटाटा व लसूण मार्केटमध्ये जवळपास १०० टन माल पडून आहे. लिलावगृहामध्ये व सर्वच गाळ्यामध्ये विक्री न झालेल्या मालाच्या गोणींची थप्पी लावून ठेवण्यात आली आहे. बेमुदत संप पुकारल्यामुळे या मालाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसात या मालाची विक्री झाली नाही तर माल खराब होवून शेतकºयांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती