शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
4
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
5
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
6
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
7
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
8
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
9
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
10
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
11
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
12
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
13
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
14
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
15
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
16
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
17
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
18
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
19
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
20
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत माथाडी, व्यापाऱ्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:48 IST

फटाक्यांची आतषबाजी : आंदोलनातून घडविले एकीचे दर्शन; मार्केटमधील व्यवहार होणार सुरळीत

नवी मुंबई : बाजार समितीच्या अस्तित्वासाठी सुरू केलेल्या लढाईमध्ये दुसºयाच दिवशी यश मिळाल्यामुळे माथाडी कामगार, व्यापारी व सर्व घटकांनी फटाके फोडून जल्लोष केला. बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच आस्थापनेवरील कर्मचाºयांसह सर्व आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला असून मध्यरात्रीपासून बाजार समितीमधील सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आंदोलन हे समीकरण झाले आहे. मुंबईमधून बाजारपेठा नवी मुंबईत स्थलांतर करण्यापासून नियमित कोणत्या ना कोणत्या प्रश्नांसाठी कधी व्यापारी, कामगार, वाहतूकदार आस्थापनेवरील कर्मचारी आंदोलन करत असतात. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांसाठी माथाडी कामगारांसह व्यापाºयांनी एकत्र लढे दिले आहेत. परंतु या सर्वांच्या आंदोलनामध्ये आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी सहसा सहभागी होत नव्हते. शासनाने २५ सप्टेंबरला काढलेला अध्यादेश व २७ नोव्हेंबरला मंजूर केलेल्या विधेयकाच्या विरोधात प्रथमच आस्थापनेवरील कर्मचारीही उघडपणे आंदोलनात सहभागी झाले होते. यामुळे दोनही दिवस पाचही मार्केटमधील १०० टक्के कामकाज बंद होते. शासनाने अध्यादेश मागे घेतल्यानंतर धान्य मार्केटमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये १० हजारपेक्षा जास्त उपस्थिती होती. व्यापारी प्रतिनिधी अशोक बढीया यांनी सर्वांनी संघटितपणे लढा दिल्यामुळे यश मिळाले असल्याचे स्पष्ट केले. पाचही मार्केटमधील सर्व घटकांनी एकीचे दर्शन घडविल्यामुळे त्याची दखल शासनाला घ्यावी लागली. यापुढेही सर्वांनी एकी कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

पणनमंत्री सुभाष देशमुख यांनीही विधेयक मागे घेतले असून भविष्यात सर्वांना विश्वासात घेवून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. परंतु बाजार समितीमध्येही शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. हमीभाव न देणाºयांवर बाजार समितीने कारवाई केली पाहिजे. मुंबई बाजार समिती जागतिक दर्जाचे मार्केट बनविण्यासाठी नवीन सुधारणांना मदत करावी, असे आवाहनही केले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी बाजार समितीमधील प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहे. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. नरेंद्र पाटील यांनीही मध्यरात्रीपासून भाजी व फळ मार्केटचे व्यवहार सुरू करण्याचे आवाहन केले.रुग्णालय उभारण्याचा प्रस्तावमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, कामगार, वाहतूकदार, शेतकरी व इतर घटक कार्यरत असतात. या सर्वांसाठी याठिकाणी सुसज्ज रुग्णालय झाले पाहिजे. बाजार समितीने त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.दुष्काळग्रस्तांनामदत करावीराज्यात दुष्काळाची स्थिती आहे. जनावरांना चाºयाची टंचाई भासणार आहे. शेतकरी अडचणीत आहेत. अशा स्थितीमध्ये बाजार समितीमधील घटकांनीही मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन पणन मंत्र्यांनी केले. दुष्काळाशी लढण्यासाठी सर्वांचे योगदान हवे असल्याचे स्पष्ट केले.बाजार समितीसह किरकोळ मार्केटमध्येही शुकशुकाटबंदच्या दुसºया दिवशी बाजार समितीमधील धान्य, मसाला, कांदा, भाजी व फळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. २ दिवसामध्ये ५० कोटींची उलाढाल थांबली आहे. सोमवारी कमी झालेली आवक व पुढील दोन दिवसाच्या बंदमुळे किरकोळ मार्केटमधील विक्रेत्यांकडे विकण्यासाठी मालच नव्हता. अनेकांनी दुकाने बंद ठेवली होती.सर्वांची उपस्थितीशासनाने विधेयक मागे घेतल्यानंतर धान्य मार्केटमधील सभेला सर्व घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, शरद मारू, मोहन गुरनानी, कीर्ती राणा, चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, संजय पानसरे, बाळासाहेब बेंडे, महेश मुंढे, अशोक बढीया, बाजार समिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ, कर्मचारी सेनेचे सुनील थोरात, नारायण महाजन बाजार समितीमधील अधिकारी, कर्मचारी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती