शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

एपीएमसी निवडणुका विधानसभेनंतर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:44 IST

पाच वर्षांचा विलंब; प्रशासनाने न्यायालयात सादर केले वेळापत्रक

- नामदेव मोरे नवी मुंबई : पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बाजारसमितीच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार असून, २९ फेब्रुवारी, २०२०ला मतदान होणार आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची ओळख आहे. देशभरातून कृषी माल याठिकाणी विक्रीसाठी येत असतो. येथील पाच प्रमुख मार्केटमधून वर्षाला १० ते १५ हजार कोटी रूपयांची उलाढाल होत असून १ लाख नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. मागील काही वर्षांपासून बाजारसमितीमधील अडचणी वाढत चालल्या आहेत. डिसेंबर २००८ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली होती. डिसेंबर २०१३ ला संचालक मंडळाची मुदत संपली परंतु शासनाने पुन्हा निवडणूक वेळेत घेतली नाही. एक वर्ष विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली. याविषयी व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर शासनाने डिसेंबर २०१४ मध्ये प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासकांची नियुक्ती केल्यानंतर एक वर्षात निवडणूका होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु प्रत्यक्षात निवडणूका न घेता प्रशासकांना मुदत वाढ देण्यात आली. उच्च न्यायालयाने प्रशासकीय मंंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली होती. १० लाख रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या कामाला न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे पाच वर्षामध्ये महत्वाची कामे करता आली नाहीत. न्यायालयानेही शासनाला निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते.न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम तयार करून तो न्यायालयात सादर केला आहे. यामुळे पाच वर्षांपासून रखडलेल्या निवडणूका पुन्हा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणूका झाल्या की याविषयीची कार्यवाही सुरू होणार आहे. ३० नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. २४ जानेवारी २०२० पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात केली जाईल.रखडलेले प्रश्न मार्गी लागणारएपीएमसीमधील प्रशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे बाजारसमितीमधील अनेक महत्वाचे प्रश्न रखडले आहेत. नवीन कोल्ड स्टोरेज, मॅफ्को कडून मिळालेल्या भूखंडाचा विकास, कांदा बटाटा मार्केटची पुनर्बांधनी, फळ मार्केटमधील नवीन इमारतीमधील जागा वाटप, भाजी मार्केटच्या बाजूला बांधलेले नवीन मार्केटमधील गाळ्यांचे वितरण व इतर प्रश्न निवडणूका झाल्यानंतर मार्गी लागू शकतात.पूर्वीची रचना कायम राहणार : संचालक मंडळाची पूर्वीचीच रचना कायम राहणार आहे. प्रत्येक महसूल विभागातून प्रत्येकी दोन याप्रमाणे १२ शेतकरी प्रतिनिधी, पाच व्यापारी प्रतिनिधी, एक माथाडी कामगार प्रतिनिधी, मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रतिनिधी व पाच शासननियुक्त प्रतिनिधी अशीच रचना राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019