शहरं
Join us  
Trending Stories
1
मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स
2
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
3
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
4
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
5
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
6
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
7
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
8
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
9
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
10
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
11
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
12
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
13
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
14
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
15
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
16
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
17
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
18
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
19
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
20
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले

एपीएमसीत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू, १८ संचालकांची होणार निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 6:18 AM

राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. २७ पैकी १८ संचालकांची मतदानाद्वारे निवड केली जाणार असून त्यामध्ये १२ शेतकरी प्रतिनिधींचा समावेश आहे. सोमवारपर्यंत २६९ जणांनी अर्ज घेतले असून ६७ जणांनी प्रत्यक्षात अर्ज भरले आहेत.राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. वर्षाला जवळपास १० हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच मार्केटमधून होत असून १ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. बाजार समितीची यापूर्वीची निवडणूक २००८ मध्ये झाली होती. डिसेंबर २०१३ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. परंतु या कालावधीमध्ये पुन्हा निवडणुका न घेता आल्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. यानंतरही निवडणुका न झाल्यामुळे शासनाने बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. पाच वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीनंतर न्यायालयाच्या आदेशावरून निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीवर एकूण २७ जणांचे संचालक मंडळ असते, त्यापैकी १८ जणांची मतदानाद्वारे निवड केली जाते. यामध्ये १२ शेतकरी प्रतिनिधी, पाच व्यापारी व एका कामगार प्रतिनिधीचा समावेश आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी २९ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल २६९ जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. २४ व २५ जानेवारीला ६ जणांनी व २७ जानेवारीला ६१ जणांनी असे एकूण ६७ जणांनी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज भरणारांमध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे, भाजी मार्केटचे माजी संचालक शंकर पिंगळे व कांदा मार्केटचे अशोक वाळूंज यांचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांमध्ये अजून किती जणांचे अर्ज दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.मुंबई बाजार समिती ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आहे. येथील संचालकांना राज्यभर मान मिळत असतो. यामुळे संचालक पदावर निवडून येण्यासाठी व सभापती व उपसभापती होण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये वर्चस्व असते. आतापर्यंत काँगे्रस व राष्ट्रवादीचे संस्थेवर वर्चस्व राहिले आहे. सहा महसूल विभागांमधून प्रत्येकी दोन याप्रमाणे १२ शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. त्या महसूल विभागामधील बाजार समित्यांचे संचालक यासाठी मतदार असतो. शेतकरी प्रतिनिधींनाच सभापती व उपसभापती होता येते. मुंबईचे धान्य कोठार म्हणूनही या संस्थेची ओळख असल्यामुळे त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी या वेळीही सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.असे असते संचालक मंडळमुंबई बाजार समितीवर २७ जणांचे संचालक मंडळ असते. यापैकी सहा महसूल विभागामधील प्रत्येक दोन याप्रमाणे १२ सदस्य असतात, बाजार समितीच्या पाच मार्केटमधील प्रत्येकी एक प्रतिनिधी व कामगारांचा एक प्रतिनिधी असतो. या १८ जणांची मतदानाद्वारे निवड केली जाते. उर्वरित ९ पैकी पाच शासन नियुक्त संचालक, मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येकी एक संचालक, पणन संचालक व बाजार समिती सचिव असे एकूण २७ संचालक असतात.माजी मंत्रीही निवडणूक रिंगणातमुंबई बाजार समितीची निवडणूक राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची समजली जाते. यापूर्वी कुमार गोसावी व रामप्रसाद बोर्डीकर या दोन आमदारांनी सभापतीपद भूषविले आहे. नाशिकचे देवीदास पिंगळे हे खासदार असताना बाजार समितीचे संचालक होते. माजी मंत्री शशिकांत शिंदे हे कॅबिनेट मंत्री असतानाही बाजार समितीचे संचालक होते. या वेळीही शिंदे हे निवडणूक रिंगणात आहेत. या वेळी किती आमदार रिंगणात राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.बाजार समितीला आले महत्त्व : यापूर्वीच्या निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरण्याची सुविधा त्या - त्या महसूल विभागामध्ये करण्यात आली होती. बाजार समितीमध्ये फक्त व्यापारी व कामगार प्रतिनिधीच अर्ज भरत होते. परंतु या वेळी सर्वांना अर्ज भरण्यासाठी मुंबई बाजार समितीमध्येच सोय केली आहे. यामुळे बाजार समितीला विशेष महत्त्व आले असून राज्यभरातून उमेदवार व त्यांचे समर्थक अर्ज भरण्यासाठी येत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई