शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:20 IST

जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी मेहुल गिरीष भानुशाली, कुणाल विनायक बाविस्कर, गणेश मोहन मस्तुद व अरविंद साहेबराव काशीद यांचा समावेश आहे.

नवी मुंबई : शासनाच्या परवानग्या न घेता, आठ कंपन्या स्थापन करून गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या टोळीतील चौघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी मेहुल गिरीष भानुशाली, कुणाल विनायक बाविस्कर, गणेश मोहन मस्तुद व अरविंद साहेबराव काशीद यांचा समावेश आहे. या चौघांनी ग्लोबल ड्रेडिंग, बी.एस. वाय. मार्केटिंग, बिलिव्ह युवर सेल मल्टिट्रेड, रॉयल पे, पीजीएमईन, माय डीएस बी असोसिएट्स, एस. एम. वर्ल्ड, ग्रोथ इंडिया या कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून प्रतिदिन दोन टक्के दराने १०० दिवस परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवी स्वीकारण्यास सुरुवात केली होती. वाशी सेक्टर १९ मधील सारंग हेरिटेज लॉज, अ‍ॅम्बियन्स कोर्ट येथे कंपनीचे काही जण पैसे स्वीकारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांनी व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही परवानग्या घेतल्या नव्हत्या. वाशीमधील एक महिलेने या कंपन्यांमध्ये पाच लाख ९० हजार रुपये गुंतविले होते; परंतु प्रत्यक्षात व्याजाची रक्कम दिलेली नाही. इतरांनाही अशाच प्रकारे आमिष दाखविले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपासात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई, अतुल लांबे, संदीप सहाणे, संतोष शेटे, सदानंद सोनकांबळे, राजेश सलगर, ताराचंद पाटील, सचिन पाटील,संदीप चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी