शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कारवाई केलेले सर्व कर्मचारी पुन्हा सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:00 IST

पालिकेमधील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मे २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान निलंबनाची कारवाई केली होती.

- नामदेव मोरे नवी मुंबई : पालिकेमधील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मे २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान निलंबनाची कारवाई केली होती. सर्वांचे निलंबन मागे घेण्यात आले असून, अनेकांवरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करताना सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात आली नव्हती. यामुळे सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांनाही पुन्हा सेवेत घ्यावे लागले आहे. चौकशी सुरू असलेल्या १२ अधिकाऱ्यांनाही दिलासा मिळाला असून, त्यांच्यावरील कारवाईचे संकट टळले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामध्ये दिरंगाई व इतर आरोपांखाली २०१६ पासून अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. एनएमएमटीमधील ९ जणांना निलंबित केले होते. पालिकेच्या आस्थापनेवरील १५ पेक्षा जास्त जणांना निलंबित केले होते. तब्बल १११ अधिकारी व कर्मचाºयांवर वेतन कपातीची कारवाई केली होती. कारवाई सत्रामुळे पालिकेमध्ये खळबळ उडाली होती.राज्यभर महापालिकेची बदनामी होऊ लागली होती. शिवसेना नगरसेवक संजू वाडे यांनी निलंबनाची कारवाई केलेल्या अधिकाºयांविषयी सर्वसाधारण सभेमध्ये विचारणा केली होती. कारवाईमधील किती जणांवरील निलंबन मागे घेतले अशी विचारणा केली होती. आयुक्तांनी दिलेल्या उत्तरामध्ये निलंबन केलेल्या सर्वांचे निलंबन मागे घेण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. यामुळे खूप मोठा गाजावाजा करून केलेल्या कारवाईमध्ये फारसे तथ्य आढळले नसल्याचेच सिद्ध झाले आहे. तत्कालीन आयुक्तांनी मालमत्ता कर विभागामध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून तत्कालीन मुख्य कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरोधात एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल केला होता. पण चौकशी अधिकाºयांनी त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नसल्याचा अहवाल दिला होता. मात्र, त्यानंतरही त्यांना सेवेत न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेतले आहे.सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली होती. त्यांना चौकशी समितीने दोषी ठरविले. पण नियमाप्रमाणे त्यांची चौकशी करताना सर्वसाधारण सभेची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु तशाप्रकारे परवानगी न घेता कारवाई केली होती.सर्वसाधारण सभेने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर प्रशासनाने तो प्रस्ताव विखंडित करून आणला होता. यानंतर राव यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे लागले आहे. राव यांच्याविरोधातील चौकशी समिती नेमताना सर्वसाधारण सभेचा अधिकार डावलण्यात आला होता. या निर्णयामुळे चौकशी सुरू असलेल्या इतर १२ अधिकाºयांनाही दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीमध्ये शहरअभियंता पदाचे काम करणाºया सुरेंद्र पाटील यांच्यासह जवळपास १२ वरिष्ठ अधिकाºयांची चौकशी सुरू होती. त्यांच्या चौकशीसाठीही महासभेची परवानगी नाही. यामुळे त्यांच्यावरील कारवाईचे संकट टळले असल्याचे मत पालिका वर्तुळात व्यक्त केले जात आहे.>राव यांच्यावरील अन्याय सुरूचन्यायालय व महासभेच्या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने जी. व्ही. राव यांना पुन्हा सेवेत घेतले आहे; परंतु त्यांना सहशहर अभियंतापद पुन्हा देण्यात आलेले नाही. त्यांना कार्यकारी अभियंतापदावर सेवेत हजर करून घेतले आहे. त्यांची नियुक्ती जुन्या मुख्यालयात करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सार्वजनिक व माताबाल रुग्णालय वगळून इतर विद्युतविषयक कामे सोपविली आहेत; पण प्रत्यक्षात राव यांच्याकडे काहीच काम दिलेले नाही. त्यांच्या विभागासाठी एकही कर्मचारी नियुक्त केलेला नाही. नागरी आरोग्य केंद्राच्या विद्युतविषयी कामेही त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली नाहीत. राव यांनी आयुक्त, शहर अभियंता व सर्वांना पत्रव्यवहार करून अद्याप काहीही काम सोपविण्यात आले नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे; परंतु अद्याप त्याविषयी काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही.>परिवहनमधीलयांना दिलासामहानगरपालिका परिवहन उपक्रमामधील सुरेश मारुती पाटील, प्रवीण लक्ष्मण जाधव, लक्ष्मण तबाजी सानप, चिंतामण केशव कदम, दीपक रोहिदास पाटील, सुनील गोविंद घोरपडे, मोहम्मद वसीम सरोले, मोहन शेंडे, दिनेश गोकुळ पाटील यांना २०१६ व १७ मध्ये निलंबित केले होते. त्यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आले आहे.>यांचेही निलंबन मागेमहापालिकेच्या आस्थापनेवरील सहशहर अभियंता जी. व्ही. राव, विरेंद्र पवार, मुख्य कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी, बाळकृष्ण श. पाटील, साहेबराव गायकवाड, बाळकृष्ण मा. पाटील, सुभाष सोनवणे, परशुराम जाधव, राजेंद्र सोनावळे, संजय खताळ, शंकर पवार, कैलास एन. गायकवाड, डॉ. चंदन पंडित, दिवाकर न. समेळ, वैभव भाये, मदन वाघचौडे यांनाही निलंबित केले होते. या सर्वांचे निलंबनही मागे घेण्यात आल्याची माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात आली आहे.>नियमाप्रमाणे कार्यवाहीप्रशासन उपआयुक्त किरणराज यादव यांच्याशी संपर्क साधला असता, १५ जणांवरील निलंबन संपुष्टात आले आहे. प्रत्येक केसमध्ये उचित कार्यवाही केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.