शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

एसीबीची धाड भासवून दरोडा टाकणाऱ्यांना अटक; ऐरोलीतली घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 31, 2023 18:41 IST

निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची धाड पडल्याचे भासवून ३४ लाख ८५ हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई: निवृत्त शासकीय अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची धाड पडल्याचे भासवून ३४ लाख ८५ हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन कार व लुटलेला २५ लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या टोळ्यांनी एकत्र येऊन स्पेशल २६ चित्रपटाप्रमाणे बनावट धाड टाकून हा गुन्हे केला होता. ऐरोली सेक्टर ६ येथे राहणाऱ्या कांतीलाल यादव यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. ते सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. २१ जुलैला दुपारी त्यांच्या घरी अज्ञात सहाजण आले होते. त्यांनी ते लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून त्यांनी हि कायदेशीर धाड असल्याचे भासवले होते.

यादरम्यान त्यांच्या टोळीचे काहीजण काही अंतरावरून भवतालच्या हालचाल लक्ष ठेवून होते. यादरम्यान घरात घुसलेल्या तोट्या एसीबीच्या पथकाने यादव यांच्या घरातून तब्बल ३४ लाख ७५ हजाराचा ऐवज एकत्र करून लुटला होता. दरम्यान एसीबीची धाड असल्याचेच समजून यादव हे देखील दोन दिवस शांत होते. मात्र त्यानंतर त्यांना संशय आल्याने तिसऱ्या दिवशी त्यांनी रबाळे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यावरून गुन्हा दाखल होताच उपायुक्त विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी निरीक्षक भागुजी औटी, सहायक निरीक्षक राकेश पगारे, दीपक खरात, उपनिरीक्षक दयानंद वणवे, हवालदार प्रसाद वायंगणकर, दर्शन कटके, टिकेकर आदींचे पथक केले होते. त्यांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासून संशयित कारची माहिती मिळवली होती. 

त्याद्वारे पुणे, कल्याण, मुंबई परिसरातून शिताफीने अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. दीपक कविटकर (४७), नरेश मिश्रा (५२), रुपेश नाईक (४२), सिद्धेश नाईक (३२), मुस्तफा करंकाळी (४०), विजय बारात (४३), देवेंद्र चाळके (३२), किशोर जाधव (४७), जुल्फिकार शेख (४३), वसीम मुकादम (३९) व आयुब खान (५०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.अशा प्रकारे लुटमारीचा त्यांचा पहिलाच गुन्हा असून काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांना पाहिजे असलेल्या व्यक्तींनी तीन वेगवेगळ्या टोळीच्या व्यक्तींना एकत्र करून यादव यांच्या घरावर धाड टाकून लुटीचा बनाव रचला होता. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार व लुटीचा २५ लाखाचा ऐवज हस्तगत केल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. 

एकमेकांनाही अनोळखी अटक केलेले सर्वजण तीन वेगवेगळ्या गटातले आहेत. गुन्हा करताना ते घरात घुसले त्यावेळी ते एकमेकांना देखील अनोळखी होते. पाहिजे असलेल्या व्यक्तींनी हा कट रचुन त्यांना गुन्ह्यात सहभागी करून घेतले होते. 

टीप कोट्यवधींची, हाती लाखो. यादव यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची अपसंपदा असल्याची टीप काही व्यक्तींना मिळाली होती. यावरून त्यांनी स्पेशल २६ प्रमाणे छापा टाकून लुटीचा बनाव रचला होता. प्रत्यक्षात मात्र ३४ लाख हाती लागल्याने त्यांचीही निराशा झाली होती. 

तीन महिन्यांपासून तयारीयादव यांच्या घरावर छापा टाकण्याची तीन महिन्यांपासून गुन्हेगारांची तयारी सुरु होती. एप्रिल मध्ये देखील त्यांनी छापा टाकण्याचा प्रयत्न केला असता काही कारणाने तो रद्द केला होता. त्यानंतर २१ जुलैला त्यांनी नियोजनाप्रमाणे छापा टाकला होता. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईArrestअटक