शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

पालिकेकडून जप्तीच्या मालाचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:34 IST

माल देण्यास टाळाटाळ; कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राउंडमधील सावळागोंधळ उघड

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान जप्त केल्या जाणाऱ्या मालाचा अपहार होत असल्याचे उघड झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी कोपरखैरणेत एका जत्रेतील साहित्य जमा करण्यात आले होते. मात्र संबंधिताने दंडाचे वीस हजार रुपये भरल्यानंतर देखील त्यांना सुमारे तीन लाखांचा त्यांचा मुद्देमाल परत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे त्यांनी डम्पिंग ग्राउंडमध्ये चौकशी केली असता, त्यांचा जप्त केलेला माल त्याठिकाणी नसल्याचे उघड झाले.पालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेबाबत सातत्याने संशय व्यक्त होत आहे. कारवाईमध्ये पारदर्शकता नसून पथकातील कर्मचारी व फेरीवाल्यांचे हितसंबंध असल्याचेही आरोप होत आहेत. त्यामुळेच अनेक ठिकाणचे रस्ते अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेले असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. तर अनेकदा कारवाईपूर्वीच फेरीवाल्यांकडून रस्ते मोकळे केले जात असल्याने त्यांना कारवाईची पूर्वकल्पना मिळत असल्याचाही दाट संशय आहे. अशातच पालिकेकडून ज्यांचा माल जप्त केला जातो, त्या मालाचाही अपहार होत असल्याचे समोर आले आहे. कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राउंडमध्ये अशा प्रकारची घटना घडली असून त्याचा आर्थिक भुर्दंड संबंधिताला बसला आहे. गणेशोत्सवादरम्यान कोपरखैरणे सेक्टर ५ ते ८ दरम्यानच्या मैदानात एका मंडळाने समोरील मोकळ्या जागेत जत्रा भरवली होती. त्यानुसार मोठमोठे आकाश पाळणे व इतर सामानाची मांडणी होत असतानाच पालिकेच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली होती. यावेळी जत्रेतील सामानापैकी सहा प्रकारच्या एकूण ३० लोखंडी वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. त्याची किंमत अंदाजे तीन लाख रुपये असल्याचे जत्रेच्या आयोजकांकडून सांगितले जात आहे. हे सामान परत मिळवण्यासाठी पालिकेकडून त्यांना २० हजार रुपयांचा दंड सांगण्यात आला. मात्र त्यांनी दंडाची रक्कम भरल्यानंतर देखील मागील दहा दिवसांपासून जप्तीचा मुद्देमाल परत देण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे त्यांनी कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राउंडमध्ये चौकशी केली असता, त्यांच्या जप्त केलेल्या मालाची नोंद आढळली. मात्र तो माल सापडत नसल्याचे त्यांना पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यावरून पालिकेकडून जप्तीच्या मालाचा अपहार होत असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.यापूर्वी देखील कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राउंडमधून जप्तीच्या हातगाड्या विकल्या जात असल्याच्या प्रकारांना अनेकांनी वाचा फोडली होती. त्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. मात्र मागील काही वर्षांपासून तिथले तीनही सीसीटीव्ही बंद असून ते जाणीवपूर्वक बंद पाडण्यात आल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे. काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या वायरी तोडण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणचे सीसीटीव्हीच दिसेनासे झाले आहेत. यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ चालत असल्याचा आरोप होत आहे.तर पथकातील कर्मचाºयांकडून सोयीनुसार दररोज रात्री जप्तीच्या मालाची वाटणी करून घरे भरली जात असल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे. यापूर्वी त्याठिकाणी आग लागल्याची देखील घटना घडली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे जप्तीचे साहित्य जळून खाक झाले होते. मात्र या आगीतून देखील संशयाचा धूर येत होता. अशातच समोर आलेल्या या प्रकारामुळे पालिका अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होवू लागला आहे. यासंंदर्भात पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता, तो झाला नाही.गणेशोत्सवादरम्यान मनोरंजनासाठी जत्रा भरवत असतानाच पालिकेने सुमारे तीन लाखांचे लोखंडी साहित्य जप्त केले होते. ते साहित्य अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते परत मिळावे यासाठी वीस हजारांचा दंड भरला. परंतु दंड भरल्यानंतर पालिकेकडून साहित्य देण्यास टाळाटाळ होत आहे. अखेर डम्पिंग ग्राउंडमध्ये चौकशी केली असता, साहित्य त्याठिकाणी नसल्याचेच उघड झाले. पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून त्या मालाचा अपहार झाला असून त्याचा आपल्याला भुर्दंड सहन करावा लागत आहे.- सिंड्रेला गोटूर,जत्रा आयोजक