शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

कोरोनाबळींमध्ये ८० टक्के पन्नाशीच्या पुढील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:25 AM

ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका : नवी मुंबई वर्षभरात १०० तरुणांचाही झाला मृत्यू 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाबळींची संख्या नवी मुंबईमध्येही वाढू लागली आहे. आतापर्यंत १२६८ जणांचा मृत्यू झाला आहे. ८० टक्के मृत्यू पन्नाशीच्या पुढील असून त्यांचा आकडा १०२३ एवढा आहे. यामुळे मनपा प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांवरील उपचारावर विशेष लक्ष दिले आहे. तरुणांमध्येही मृत्यूचा धोका वाढत असून आतापर्यंत तब्बल १०० तरुणांचा मृत्यू झाला आहे. दहा वर्षांच्या आतील दोन जणांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.             कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युदर वाढू लागला असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. प्रतिदिन ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची कमतरता असल्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत व अनेकांना जीव गमवावा लागत आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मृत्युदर रोखण्यावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वयोगटानुसार मृत्युदराचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे.  मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणारांचा सर्वाधिक समावेश आहे. एकूण मृत्यूपैकी ८० टक्के पन्नाशीच्या पुढील असल्याचे निदर्शनास आले आहे. ४० ते ५० वयोगटांतील १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ५० ते ६० वयोगटांतील ३१६ जणांचा व ६० ते ७० वयोगटातील ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ७० ते ८० वयोगटातील २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. ८० ते १०० वयोगटातील ९४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.ज्येष्ठ नागरिकांमधील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावरील उपचारावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पन्नाशीच्या पुढील सर्व रुग्ण मनपाच्या निगराणीखाली असणार आहेत. त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख केली जाणार असून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तरुणांमध्येही मृत्यूचे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखे नाही. आतापर्यंत ११ ते ४० वयोगटातील १०० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे व वेळेत चाचणी करून उपचार सुरू न केल्यामुळे अनेक तरुणांचा मृत्यू होत आहे.