६ ग्रामपंचायती तंटामुक्त
By Admin | Updated: February 15, 2015 00:25 IST2015-02-15T00:25:42+5:302015-02-15T00:25:42+5:30
रोहा तालुक्यातील तंटामुक्त ठरलेल्या ६ ग्रामपंचायतींना रोहा पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

६ ग्रामपंचायती तंटामुक्त
रोहा : रोहा तालुक्यातील तंटामुक्त ठरलेल्या ६ ग्रामपंचायतींना रोहा पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये खैरेखुर्द, न्हावे, मालसई, पुई, तांबडी, चिंचवली तर्फे आतोणे यांचा समावेश आहे. या प्रसंगी बोलताना वाळीत प्रकरणांमध्ये अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे. प्रशासन गावकी प्रथेच्या विरोधात नाही परंतु गावकीतून वादविवाद होण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबविले जावेत, असे मत पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांनी व्यक्त केले.
व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे, रोहा तहसिलदार उर्मिला पाटील उपस्थित होते. यावेळी धुमाळ म्हणाले की, रोहा तालुक्यातील जनतेने मागील निवडणुका व सणवार यामध्ये सामाजिक सलोखा व शांतता प्रस्थापित ठेवण्यात हातभार लावला आहे. कोकण रेल्वेच्या दुर्घटनेनंतर रोहा तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन कौतूक करण्यात आले आहे. परंतू आपल्या तालुक्याला वाळीत प्रकरणांचा लागलेला डाग पुसून काढण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी पांडुरंग कोंड, संजय मांडलुस्कर, उत्तम नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक दिनेश कदम, एपीआय भागवत, महिला पोलीस उपनिरीक्षक निरभवणे, पालांडे यांच्यासह पोलीस स्टाफ व पारितोषिक प्राप्त गावातील नागरिक, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील अध्यक्ष, तंटामुक्त समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
च्रोहा तालुक्यातील गाव पोलीस पाटील या ंना पोलीस पाटील वह्यांचे वाटप करण्यात आले. पोलीस पाटील यांनी गावात येणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नोंद पुस्तिकेत घ्यावी.
च्आपल्या गावामध्ये घडणाऱ्या लहान सहान घटना तसेच किरकोळ वाद याची देखील नोंद ठेवून संबंधित माहिती पोलीस ठाण्यापर्यंत पोहचवावी.
च्माहितीचे आदान प्रदान झाल्यास गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात यश मिळू शकेल असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे पाटील यांनी व्यक्त केले.
रोहा तालुका वाळीत मुक्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत त्याचप्रमाणे जेथे स्वच्छता आणि शांतता असते तेथे लक्ष्मी नांदते. यामुळेच प्रत्येकाने तंटामुक्त गाव याबरोबरच आपला गाव स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- उर्मिला पाटील,
रोहा तहलिदार.