शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

अमृत जलयोजनेसाठी ५०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:45 AM

पनवेल परिसराला मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा करण्याकरिता सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल परिसराला मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा करण्याकरिता सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी शासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. याअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जुनाट झालेली जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाविष्ट गावांमध्ये नव्याने जलवितरण व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जवाहरलाल नेहरू जलशुद्धीकरण केंद्र ते जेएनपीटी व पनवेल या दरम्यान ३0 वर्षांपूर्वी ११५ एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात आली होती, परंतु ही वाहिनी अतिशय जुनाट होऊन ठिकठिकाणी गंजली आहे. त्यामुळे पाण्याच्या दाबाने ती वारंवार फुटत आहेच. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाण्याची गळती होत आहे. वाहिन्यांना पॅच मारण्याकरिता प्राधिकरणाकडून सातत्याने शटडाउन घेतला जात आहे. त्यामुळे पनवेलकर आणि सिडको वसाहतीतील रहिवाशांना तीन-चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे या वाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव आहे, परंतु निधीअभावी हे काम होत नव्हते. महापालिकेकडे १९६ कोटी रुपयांची मागणी केली जात होती, परंतु मालकी एमजेपीची असताना मनपाने का पैसे द्यायचे असा सवाल मनपा प्रशासनाने केला. तसेच २0११च्या जनगणनेनुसार महापालिका हद्दीतील लोकसंख्या पाच लाख आहे. मात्र तसे पाहिले गेले तर ही लोकवस्ती आठ लाखांपेक्षा जास्त असल्याची वस्तुस्थिती आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मांडली. त्यानुसार शासनाने वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. त्यानुसार ३७६ कोटी रुपये खर्च करून एमजेपीची जलवाहिनी बदलण्याबरोबरच अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे.