शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

ठाणे जिल्ह्यात ५ हजार धोकादायक इमारती

By admin | Updated: August 10, 2015 02:22 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या २४ तासांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील एकाही महापालिकेने अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची माहिती देण्याचे सौजन्य दाखविले नाही

पंकज रोडेकर, ठाणेजिल्हाधिकाऱ्यांच्या २४ तासांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील एकाही महापालिकेने अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची माहिती देण्याचे सौजन्य दाखविले नाही. तसेच ४८ तास उलटूनही एकाही महापालिकेने त्याबाबत माहिती न दिल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने त्याची माहिती गोळा केली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये सुमारे ५ हजार अतिधोकादायक आाणि धोकादायक इमारतींचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६८३ अतिधोकादायक तर ४२८० धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे लाखोंचे जीव टांगणीला लागले आहेत.भिवंडी अतिधोकादायकमध्ये तर धोकादायक इमारतींत ठाणे महापालिका आघाडीवर आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईत एकही अतिधोकादायक इमारत नसली तरी धोकादायक इमारतींचा आकडा तेथे शंभरच्या घरात पोहोचला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये एक अतिधोकादायक तर ६ धोकादायक इमारती असल्याचे त्या महापालिकेने दिलेल्या माहितीत नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नौपाड्यातील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेनंतर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी तातडीने सर्व महापालिकांची विशेष बैठक बोलविली होती. त्या वेळी ठाकुर्ली येथे काही दिवसांपूर्वी पडलेली इमारत आणि नौपाडा येथील इमारत दुर्घटना यांचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे निष्कासन करून त्यांना तात्पुरता निवारा देणे गरजेचे आहे. तसेच महापालिकांना अशा इमारती पाडण्यासाठी पुरेसे पोलीस संरक्षण मिळते का, अशी विचारणा केली. पालिकांनी किती वेळा अशा रीतीने पोलीस संरक्षण मागविल्याची माहितीही (आकस्मिक आराखडा ) २४ तासांत सादर करण्याचे निर्देश त्या वेळी त्यांनी दिले होते. मात्र, एकाही महापालिकेने याबाबत २४ तासांत नाही तर ४८ तास झाल्यानंतरही माहिती सादर केली नव्हती. नाइलाजाने अखेर जिल्हा प्रशासनानेच त्यांच्या पाठीमागे लागून माहिती गोळा केली. त्यात, ठाणे महापालिकेने २८ अतिधोकादायक इमारतींवर क ारवाई केलेली आहे. १४ इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. तर, उर्वरित १६ इमारती रिकाम्या करण्यास पोलिसांना निर्देश दिले असल्याचे सांगितले आहे.