शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मोरबेत ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक, शहरातील पाण्याच्या अपव्ययाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By योगेश पिंगळे | Updated: April 3, 2024 16:51 IST

पाणी वाटपासाठी महापालिकेच्या माध्यमातून योग्य नियोजन केले जात असल्याने शहरवासीयांची तहान वर्षभर भागते.

नवी मुंबई : शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण मागील वर्षी पावसाळ्यात १०० टक्के भरले होते. धरणात सद्यस्थितीत ४७.20 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा केवळ १० ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकाच आहे. यंदा पावसाळा लांबणीवर गेल्यास किंवा कमी पाऊस झाल्यास धरणातील पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असेल अशा परिस्थितीत पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक असताना शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नवी मुंबई शहराला महापालिकेच्या मोरबे धरणात पाणीपुरवठा केला जातो. या धरणात ८८ मीटर उंचीपर्यंत पाण्याची साठवणूक करता येते. या धरणातील पाणी साठ्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घणमीटर इतकी असून दररोज ४८१ दशलक्ष लिटर पाणी नवी मुंबई महापालिका हद्दीमधील विविध नोड, एमआयडीसी क्षेत्र तसेच पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे, खारघर आदी भागात पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. 

पाणी वाटपासाठी महापालिकेच्या माध्यमातून योग्य नियोजन केले जात असल्याने शहरवासीयांची तहान वर्षभर भागते. सध्यस्थितीत धरणात सुमारे ४७.२० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून शहराच्या दैनंदिन पाण्याच्या गरजेनुसार उपलब्ध पाणीसाठा साधारण १० ऑगस्टपर्यंत पुरणार आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी अनेक ठिकाणी पाणी चोरीच्या घटना तसेच पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. 

टॅग्स :DamधरणWaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई