नवीन पनवेल : लोणावळा येथे सूर्यादय पाहून मुंबईत परतताना झालेल्या भीषण अपघातामध्ये आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ओमकुमार बोरसे (२३, नाशिक) लय देशभ्रतार (२२, नागपूर) आणि श्रेयांश शर्मा (२२, जयपूर) अशी मृतांची नावे आहेत. हा भीषण अपघात मुंबई-पुणे महामार्गावर गुरुवारी पहाटे झाला.
आयआयटी पवई, मुंबई येथील ओमकुमार बोरसे, श्रेयांश शर्मा, लय देशभ्रतार, हितेश कुमार मीना, सोहम चव्हाण, सिद्धांत जेबल हे सहा विद्यार्थी १८ मार्चला रात्री चित्रपट पाहून पहाटे सूर्योदय पॉईंट पाहण्यासाठी कारने मुंबईहून लोणावळ्याला गेले होते. परतीच्या प्रवासात भाताण बोगदा ओलांडल्यानंतर त्यांनी लेन क्रमांक तीनवरील कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता कार कंटेनरवर धडकली. या भीषण अपघातामध्ये कारमधील ओमकुमार, श्रेयांश आणि लय यांचा मृत्यू झाला, इतर तिघे जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, या प्रकरणाची पनवेल तालुका पोलिसांनी नोंद केली आहे.
Web Summary : Three IIT Mumbai students died in a car accident on the Mumbai-Pune highway near Lonavala. The students were returning from a sunrise viewing point when their car collided with a container truck. Three others were injured and hospitalized.
Web Summary : लोनावाला के पास मुंबई-पुणे राजमार्ग पर सूर्योदय देखकर लौट रहे आईआईटी मुंबई के तीन छात्रों की सड़क दुर्घटना में मौत हो गई। कंटेनर ट्रक से कार टकराने से हादसा हुआ। तीन अन्य घायल हैं।