शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी २८ हजार अर्ज, आचारसंहितेमुळे प्रक्रियेला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 02:53 IST

नवी मुंबई शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

- योगेश पिंगळेनवी मुंबई - शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यंदा योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातून सुमारे २८ हजार अर्ज महापालिकेला प्राप्त झाले असून, त्या अनुषंगाने सुमारे १८ कोटी रुपयांचे वाटप करावे लागणार आहे. आचारसंहितेमुळे शिष्यवृत्ती योजनेचे पैसे वाटप प्रक्रि येला विलंब झाला आहे.नवी मुंबई शहरात विविध घटकातील नागरिक वास्तव्य करतात. या नागरिकांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने विविध माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून शालेय साहित्य, गणवेश, भोजन यासारख्या सुविधा देखील पुरविल्या जातात. शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांची मुले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले, मागासवर्गीय घटकातील मुले, विधवा, घटस्फोटित महिलांची मुले, दगडखाण बांधकाम करणाºया कामगारांची मुले या सर्व घटकातील पहिली ते पदवी आणि त्यानंतर तांत्रिक / व्यवसाय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचा विकास आणि कुटुंबाची उन्नती खुंटते. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती आणि गुणवत्ता वाढीस मदत व्हावी या अनुषंगाने महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेची मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याने मागील वर्षापेक्षा यंदा दुप्पट अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी १४हजार ५00 अर्ज दाखल झाले होते, त्या वेळी ९ कोटी ८७ लाख रु पयांचे वाटप करण्यात आले होते. यंदा२८ हजार अर्ज दाखल झाले असून १७ कोटी ९0 लाख रु पयांचे वाटप करावे लागणार आहे. दोन महिन्यांपूर्वी याबाबतचा प्रस्ताव महासभेत अंतिम मंजुरीसाठी आला होता. परंतु सदरच्या प्रस्तावावर महिला बालकल्याण समिती सभेत चर्चा व्हावी आणि त्या समितीच्या माध्यमातून महासभेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने शिष्यवृत्ती वाटपाला विलंब झाला आहे.वर्षनिहाय प्राप्त अर्ज2015-16 70002016-17 - 70002017-18 145002018-19 28000विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती रक्कमपहिली ते चौथी 4000पाचवी ते सातवी 6000आठवी ते दहावी 8000अकरावी आणि बारावी 9600महाविद्यालयीन ते पदवी 12000पदवीनंतरचे शिक्षण 16000तंत्र प्रशिक्षण 8000 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाEducation Sectorशिक्षण क्षेत्र