शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 02:31 IST

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत. सिडको व महानगरपालिकेने आतापर्यंत ११८ जलकुंभ बांधले असून, त्यापैकी ९४ सद्यस्थितीमध्ये वापरामध्ये आहेत. शहरातील २५ जलकुंभ धोकादायक असून, तीन निष्कासित करण्यात आले आहेत.नवी मुंबई शहर बसविताना शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोने शहरातील विविध नोडमध्ये २८ उच्चस्तरीय आणि ४६ भूस्तरीय जलकुंभ बांधले होते. महापालिकेच्या स्थापनेनंतर सर्वच जलकुंभ सिडकोने महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. महानगरपालिकेने शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा, यासाठी मोरबे धरण विकत घेतले. मोरबे धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर असून, दररोज ३८० ते ३९० एमएलडी पाणीसाठ्याची शहराला गरज आहे. शहरातील नागरिकांना कराव्या लागणाऱ्या पाण्याची साठवणूक या जलकुंभांमध्ये केली जाते. आवश्यकतेनुसार महापालिकेने शहरात सुमारे १९ उच्चस्तरीय आणि २५ भूस्तरीय जलकुंभ बांधले आहेत. यामुळे एकूण जलकुंभांची संख्या ११८ झाली आहे. नव्याने ९ उच्चस्तरीय आणि १० भूस्तरीय जलकुंभ बांधण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी महासभेने मंजुरीही दिली असून, दिघा भागात एक उच्चस्तरीय आणि १ भूस्तरीय जलकुंभ बांधण्याचे काम सुरू आहे. सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या जलकुंभांचे आयुष्य संपले असून, अनेक जलकुंभांना तडे गेले आहेत. जलकुंभांच्या संरक्षक भिंतींची दुरवस्था झाली असून, जलकुंभांच्या आवारात स्वच्छता राखली जात नाही, त्यामुळेही जलकुंभांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धोकादायक जलकुंभ आणि त्यांची सुरक्षा याबाबत नगरसेवकांनी अनेक वेळा महासभा आणि स्थायी समिती सभेत चर्चादेखील केली आहे.महापालिकेच्या माध्यमातून जलकुंभांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते. महापालिकेने १६ उच्चस्तरीय आणि १६ भूस्तरीय जलकुंभांचे स्ट्रक्चर आॅडिटही केले असून, यामध्ये सात उच्चस्तरीय आणि १८ भूस्तरीय जलकुंभ धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. वापरात नसलेल्या जलकुंभांची संख्या सुमारे १८ असून त्यापैकी तीन उच्चस्तरीय जलकुंभ निष्कासित करण्यात आले आहेत. धोकादायक झालेल्या जलकुंभांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता असून, पर्यायी सुविधा नसल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. महापालिका प्रशासन आयआयटीच्या माध्यमातून जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण करून घेत असून, आलेल्या अहवालाप्रमाणे दुरुस्ती व इतर कामे केली जात आहेत. धोकादायक ठरविलेल्या जलकुंभांच्या जागेवर नवीन जलकुंभ उभारण्यास सुरुवात केली आहे; काही ठिकाणी निविदा प्रक्रिया वेळेत होत नसल्यामुळे काम रखडले आहे.३२ जलकुंभांचे लेखापरीक्षणमहापालिकेने आतापर्यंत ३२ जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण केले आहे. यामध्ये १६ उच्चस्तरीय व १६ भूस्तरीय जलकुंभांचा समावेश आहे.आवश्यकतेप्रमाणे जुन्या जलकुंभांचे लेखापरीक्षण आयआयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. लेखापरीक्षण अहवालाप्रमाणे दुरुस्ती व पुन्हा नवीन बांधण्याचा निर्णय घेतला जात आहे.नवीन जलकुंभांचे बांधकामही सुरूमहापालिका क्षेत्रामध्ये दोन जलकुंभांचे बांधकाम सुरू आहे. १९ जलकुंभांना महापालिकेने परवानगी दिली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे काम सुरू केले जाणार आहे. वाशी सेक्टर ५ मधील जलकुंभही धोकादायक घोषित केला असून, निविदा प्रक्रिया सुरू केली आहे; परंतु निविदेस अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.शहरातील सर्व जलकुंभांची नियमित देखभाल केली जात आहे. आवश्यकतेप्रमाणे जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण केले जात असते व येणाºया अहवालाप्रमाणे त्यावर उचित कार्यवाही करण्यात येते. धोकादायक ठरलेल्या जलकुंभांच्या ठिकाणी व मागणीप्रमाणे नवीन जलकुंभही उभारले जात आहेत.- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता,नवी मुंबई महानगरपालिकावाशी परिसरातील धोकादायक जलकुंभांविषयी सर्वसाधारण सभेमध्ये व स्थायी समितीमध्ये वारंवार आवाज उठविला आहे. प्रशासनाने सर्वच जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण करावे व धोकादायक जलकुंभाच्या ठिकाणी तत्काळ नवीन जलकुंभ उभारण्यात यावेत.- दिव्या गायकवाड, नगरसेविका, प्रभाग प्रभाग ६४अपघाताची शक्यताधोकादायक घोषित केलेल्या जलकुंभांपैकी काही जलकुंभांचा अद्याप वापर सुरू आहे. वेळेत नवीन जलकुंभ उभारण्याची कार्यवाही सुरू केली नाही तर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील १८ जलकुंभांचा वापर बंद असून आतापर्यंत तीन जलकुंभ निष्कासित करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई