शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

गरीब विद्यार्थी वंचित; आरटीई प्रवेशाकडे ८३५ विद्यार्थ्यांची पाठ, दोन हजार जागांसाठी १७ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:25 IST

शहरातील खासगी मोठ्या शाळांमध्ये पाल्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेक पालक खोटा उत्पन्नाचा दाखला दाखवतात. (RTE admission)

योगेश पिंगळे -नवी मुंबई : आर्थिकदृृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आरटीई योजनेचा लाभ घेण्यासाठी या वर्षी नवी मुंबई शहरात दोन हजार ४५ जागांसाठी १७,४९१ अर्ज प्राप्त झाले होते, परंतु प्रवेश निश्चित झालेल्या ८३५ विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे प्रवेश घेण्याकडे पाठ फिरविली आहे.

सर्वच स्तरांतील पालक या प्रकियेत सहभागी होत असल्याने गरीब कुटुंबातील विद्यार्थी या लाभापासून वंचित राहत आहेत.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार, सर्वच शाळांमध्ये आर्थिकदृृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या वर्षी लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी विलंबाने सुरू झाली. नवी मुंबईत दोन हजार ४५ जागांसाठी १७,४९१ अर्ज प्राप्त झाले. ८३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध कारणांमुळे होऊ शकले नाही.

शहरातील खासगी मोठ्या शाळांमध्ये पाल्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली असलेले अनेक पालक खोटा उत्पन्नाचा दाखला दाखवतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ आवश्यक आहे, असे गरीब घरातील विद्यार्थी मात्र वंचित राहात आहेत.

तक्रार क्रमांक 1 -लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर, अनेक विद्यार्थी मूळगावी गेले होते. ते अद्याप परतलेले नाहीत, त्यामुळे निवड होऊनही अनेक विद्यार्थांनी प्रवेश घेतलेले नाहीत.

तक्रार क्रमांक 2 -आरटीई प्रक्रियेला विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार का? या भीतीने पालकांनी आपल्या पाल्यांचे इतर शाळांमध्ये प्रवेश घेतले. त्यामुळे निवड होऊनही अनेक विद्यार्थांनी प्रवेश घेतले नाहीत.

शासनाने मुदत वाढवली -आरटीईअंतर्गत प्रवेश निश्चित झालेले पालक आणि विद्यार्थी गावी असल्याने, ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तसेच या वर्षी शासनाच्या माध्यमातून मुदत वाढवली होती.- योगेश कडुसकर (उपायुक्त, शिक्षण विभाग, न.मुं.म.पा.)

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा