शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

जगन मोहन रेड्डींना धक्का; आईचा YSR काँग्रेसला रामराम, 'या' पक्षात करणार प्रवेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 16:37 IST

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आई आणि वायएसआरसीपी नेत्या वायएस विजयम्मा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमरावती: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy)यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आई आणि YSRCP नेत्या वायएस विजयम्मा (Y. S. Vijayamma)यांनी पक्षाच्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत वायएस विजयम्मा म्हणाल्या की, 'मी या पक्षापासून वेगळा होण्याचा विचार करत आहे.' त्यांनी आता मुलगी शर्मिला यांच्या तेलंगाणातील पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाच्या बैठकीत विजयम्मा यांनी आता यापुढे मुलीच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले त्या म्हणाल्या की, 'शर्मिला (त्यांची मुलगी) एकटी लढत आहे. राजशेखर रेड्डी यांची पत्नी आणि शर्मिलाची आई या नात्याने मला तिच्या पाठीशी उभे राहावे लागेल, असे माझे मन मला सांगत आहे. तो (वायएस जगन मोहन रेड्डी) अडचणीत असताना मी त्याच्यासोबत होते, आता तो इथे आनंदी आहे. माझी मुलगी (वायएस शर्मिला) एकटी लढत आहे, मी तिला साथ दिली नाही तर अन्याय होईल. मी सर्वांना विनंती करते की, मला माफ करा.' आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या आई वायएस विजयम्मा यांनी शुक्रवारी त्यांची मुलगी शर्मिला यांच्या पक्षात सामील होण्यासाठी वायएसआर काँग्रेसच्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

शर्मिला शेजारील राज्यातील वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख आहेत. लवकरच तेलंगणात निवडणुका होणार आहेत. आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना विजयम्मा म्हणाल्या की, 'मी नेहमीच जगनच्या जवळ राहीन. पुढे जाण्यासाठी माझी मुलगी तेलंगणात एकटी लढाई लढत आहे. मला तिला साथ द्यावी लागेल. मी दोन राजकीय पक्षांची (दोन राज्यात) सदस्य होऊ शकते की, नाही या द्विधा मनस्थितीत होते. वायएसआर काँग्रेसचे मानद अध्यक्ष म्हणून राहणे माझ्यासाठी कठीण आहे. अशी परिस्थिती निर्माण होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. हे का घडले हे मला माहित नाही, परंतु मला वाटते की ही देवाची इच्छा आहे.' विशेष म्हणजे, काही काळापासून जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात मालमत्तेशी संबंधित मुद्द्यांवर मतभेद सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील कटुता खूप वाढली आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाElectionनिवडणूक