शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

नमो 2.0 ... मोदी सरकारचा 'सिक्वेल' होईल का हिट?; तरुणाईशी 'मन की बात' 

By सायली शिर्के | Updated: May 30, 2019 17:03 IST

तरुणाईने आणि जनतेने 'फिर एक बार मोदी सरकार' म्हणत नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. 'नमोपर्व' सुरू होत असताना तरुणाईशी साधलेला संवाद... 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांसह तरुणाईचा जोश पाहायला मिळाला. या निवडणुकीत तरुणाईची मते निर्णायक ठरली आणि देशात पुन्हा एकदा मतदारांनी पंतप्रधानपदाची धुरा नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविली. नरेंद्र मोदींनी प्रचारादरम्यान तरुणांना मतदान करण्याची साद घातली होती, ती निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्याचे समजते.

तरुणाईने आणि जनतेने 'फिर एक बार मोदी सरकार' म्हणत नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. एकट्या भाजपाला ३०३, तर एनडीएला ३५३ जागा मिळाल्यात. या बहुमताच्या जोरावर ठरवलं तर काहीही करता येऊ शकतं. स्वाभाविकच, मोदी सरकारकडून प्रचंड अपेक्षा आहेत. नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळासोबत आज शपथ घेणार आहेत. हे 'नमोपर्व' सुरू होत असताना तरुणाईशी साधलेला संवाद... 

 

शास्त्र सांगत यथा राजा तथा प्रजा. मग प्रश्न आहे मोदीजींनी विकास केला की भाजपा सरकारने? अर्थात पंतप्रधान म्हणून त्यांचे मार्गदर्शन होते म्हणूनच हे सरकार पुन्हा आले आहे. 'फिर एक बार' ही उक्ती असंच सांगते पुन्हा एकदा याचा अर्थ पुन्हा पुन्हा दर पाच वर्षांनी हेच सरकार येईल असा नाही तर जनतेने या सरकारला अजून एक संधी दिली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेली विकासाची वाटचाल उल्लेखनीय आहे. परंतू याचा अर्थ विरोधक विकास करत नाही किंवा करणार नाही असा घेऊ शकत नाही. आलेलं सरकार हे सर्वस्वी भाजपाचे आहे का? की हा विजय महायुतीच्या आधारावर आहे हा एक प्रश्नच आहे? अर्थात सरकार कोणतही असो नेता कोण आहे हे महत्वाचं. पुढील पाच वर्षात सरकारने स्त्री संरक्षण, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी, पाणी समस्या यावर विचार करून मार्ग काढावा. 

- सिद्धी म्हात्रे

देशात पुन्हा एकदा NDA सरकार स्थापन झालं, NDA ला मतदारांनी बहुमत दिलं, याचा अर्थ मोदींच्या नेतृत्वावर अजूनही जनतेचा भरवसा आहे. 2014 ला महागाई, भ्रष्टाचाराने होरपळलेली जनता सरकार बदलाच्या अपेक्षेत होती, आणि मोदींच्या रूपाने मतदारांनी तो बदल घडवून आणला चांगले दिवस पाहण्यासाठी. रोजगार, शेतमालाला दीड पट हमीभाव, आणि प्रमुख काही सोयी पुरवण्याचं आश्वासन जनतेला मिळालं होतं , त्या आश्वासनांची पूर्तता कितपत झाली माहिती नाही. कदाचित माझ्या वा माझ्यासारख्यांपर्यंत पूर्णपणे ती पोहचली नाहीत. 2019 ला पुन्हा आश्वासनं देऊन आशेचा किरण दाखवणारं इतर कोणी दिसलंच नाही पुढे मग 'बुडणाऱ्याला काठीचा आधार' या नियमांनं पुन्हा मोदी साहेबांनाच जनतेनं कौल दिला. त्यामुळे निदान या 5 वर्षात तरी ही आश्वासनं पूर्ण झालेली पाहायला मिळावीत , ही या पाच वर्षात सरकारकडून अपेक्षा आहे. 

- सुमित सावंत

 

तरूणाई राजकारणात पडत नाही याचा अर्थ ते डोळेझाक करतात असा होत नाही. सरकार कोणाचही आलं तरी सर्वसामान्यांच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही. यावेळी पुन्हा एकदा मोदी सरकार आलं आहे. मागच्या पाच वर्षात डिजिटल इंडियामुळे सकारात्मक बदल झाला. त्यामुळे येत्या पाच वर्षातही देशात आणखी काही सकारात्मक बदल व्हावेत ही लोकांची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदींसारख्या कर्तव्यदक्ष पंतप्रधानांमुळे विकास होतोय.  त्यामुळेच पुन्हा एकदा मोदी सरकार. 

- वर्षा पाटील 

आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. सैन्यदल, हवाईदल यांसंदर्भात योग्य निर्णय तसेच अत्याधुनिक सोयीसुविधेसाठी पुढाकार घ्यावा. बेरोजगारी, गरिबी यासह देशात असलेल्या समस्येचा गांभीर्याने विचार करावा. जनतेने विश्वासान सरकारला निवडून दिले आहे. त्यामुळे सरकारने ही प्रामुख्याने जनतेच्या हिताकडे लक्ष द्यावे. 

- मृणाल सावंत 

 

अब की बार मोदी सरकार असं म्हणत जनतेने पुन्हा एकदा भाजपाला निवडून दिले. विकासाच्या केवळ चर्चा होतात. पण आता खरंच लोकांना विकास अपेक्षित आहे. त्यामुळेच जिंकून आलेल्या नेतेमंडळींनी लोकांच्या हिताचा नक्कीच विचार करावा. बेरोजगारी ही सध्याच्या तरुणांसाठी एक समस्या आहे. त्यामुळे सरकारने रोजगारासाठी काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मोदी सरकारला आणखी पाच वर्ष विकास करण्याची संधी लोकांनी दिली आहे. त्यामुळे त्यांनीही देशाला भेडसावणाऱ्या समस्यांवर लवकरात लवकर उपाय शोधावेत. 

- वैभव सकपाळ

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा