शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नमो 2.0 ... मोदी सरकारचा 'सिक्वेल' होईल का हिट?; तरुणाईशी 'मन की बात' 

By सायली शिर्के | Updated: May 30, 2019 17:03 IST

तरुणाईने आणि जनतेने 'फिर एक बार मोदी सरकार' म्हणत नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. 'नमोपर्व' सुरू होत असताना तरुणाईशी साधलेला संवाद... 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांसह तरुणाईचा जोश पाहायला मिळाला. या निवडणुकीत तरुणाईची मते निर्णायक ठरली आणि देशात पुन्हा एकदा मतदारांनी पंतप्रधानपदाची धुरा नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविली. नरेंद्र मोदींनी प्रचारादरम्यान तरुणांना मतदान करण्याची साद घातली होती, ती निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्याचे समजते.

तरुणाईने आणि जनतेने 'फिर एक बार मोदी सरकार' म्हणत नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. एकट्या भाजपाला ३०३, तर एनडीएला ३५३ जागा मिळाल्यात. या बहुमताच्या जोरावर ठरवलं तर काहीही करता येऊ शकतं. स्वाभाविकच, मोदी सरकारकडून प्रचंड अपेक्षा आहेत. नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळासोबत आज शपथ घेणार आहेत. हे 'नमोपर्व' सुरू होत असताना तरुणाईशी साधलेला संवाद... 

 

शास्त्र सांगत यथा राजा तथा प्रजा. मग प्रश्न आहे मोदीजींनी विकास केला की भाजपा सरकारने? अर्थात पंतप्रधान म्हणून त्यांचे मार्गदर्शन होते म्हणूनच हे सरकार पुन्हा आले आहे. 'फिर एक बार' ही उक्ती असंच सांगते पुन्हा एकदा याचा अर्थ पुन्हा पुन्हा दर पाच वर्षांनी हेच सरकार येईल असा नाही तर जनतेने या सरकारला अजून एक संधी दिली आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेली विकासाची वाटचाल उल्लेखनीय आहे. परंतू याचा अर्थ विरोधक विकास करत नाही किंवा करणार नाही असा घेऊ शकत नाही. आलेलं सरकार हे सर्वस्वी भाजपाचे आहे का? की हा विजय महायुतीच्या आधारावर आहे हा एक प्रश्नच आहे? अर्थात सरकार कोणतही असो नेता कोण आहे हे महत्वाचं. पुढील पाच वर्षात सरकारने स्त्री संरक्षण, भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी, पाणी समस्या यावर विचार करून मार्ग काढावा. 

- सिद्धी म्हात्रे

देशात पुन्हा एकदा NDA सरकार स्थापन झालं, NDA ला मतदारांनी बहुमत दिलं, याचा अर्थ मोदींच्या नेतृत्वावर अजूनही जनतेचा भरवसा आहे. 2014 ला महागाई, भ्रष्टाचाराने होरपळलेली जनता सरकार बदलाच्या अपेक्षेत होती, आणि मोदींच्या रूपाने मतदारांनी तो बदल घडवून आणला चांगले दिवस पाहण्यासाठी. रोजगार, शेतमालाला दीड पट हमीभाव, आणि प्रमुख काही सोयी पुरवण्याचं आश्वासन जनतेला मिळालं होतं , त्या आश्वासनांची पूर्तता कितपत झाली माहिती नाही. कदाचित माझ्या वा माझ्यासारख्यांपर्यंत पूर्णपणे ती पोहचली नाहीत. 2019 ला पुन्हा आश्वासनं देऊन आशेचा किरण दाखवणारं इतर कोणी दिसलंच नाही पुढे मग 'बुडणाऱ्याला काठीचा आधार' या नियमांनं पुन्हा मोदी साहेबांनाच जनतेनं कौल दिला. त्यामुळे निदान या 5 वर्षात तरी ही आश्वासनं पूर्ण झालेली पाहायला मिळावीत , ही या पाच वर्षात सरकारकडून अपेक्षा आहे. 

- सुमित सावंत

 

तरूणाई राजकारणात पडत नाही याचा अर्थ ते डोळेझाक करतात असा होत नाही. सरकार कोणाचही आलं तरी सर्वसामान्यांच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही. यावेळी पुन्हा एकदा मोदी सरकार आलं आहे. मागच्या पाच वर्षात डिजिटल इंडियामुळे सकारात्मक बदल झाला. त्यामुळे येत्या पाच वर्षातही देशात आणखी काही सकारात्मक बदल व्हावेत ही लोकांची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदींसारख्या कर्तव्यदक्ष पंतप्रधानांमुळे विकास होतोय.  त्यामुळेच पुन्हा एकदा मोदी सरकार. 

- वर्षा पाटील 

आर्थिक समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. सैन्यदल, हवाईदल यांसंदर्भात योग्य निर्णय तसेच अत्याधुनिक सोयीसुविधेसाठी पुढाकार घ्यावा. बेरोजगारी, गरिबी यासह देशात असलेल्या समस्येचा गांभीर्याने विचार करावा. जनतेने विश्वासान सरकारला निवडून दिले आहे. त्यामुळे सरकारने ही प्रामुख्याने जनतेच्या हिताकडे लक्ष द्यावे. 

- मृणाल सावंत 

 

अब की बार मोदी सरकार असं म्हणत जनतेने पुन्हा एकदा भाजपाला निवडून दिले. विकासाच्या केवळ चर्चा होतात. पण आता खरंच लोकांना विकास अपेक्षित आहे. त्यामुळेच जिंकून आलेल्या नेतेमंडळींनी लोकांच्या हिताचा नक्कीच विचार करावा. बेरोजगारी ही सध्याच्या तरुणांसाठी एक समस्या आहे. त्यामुळे सरकारने रोजगारासाठी काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मोदी सरकारला आणखी पाच वर्ष विकास करण्याची संधी लोकांनी दिली आहे. त्यामुळे त्यांनीही देशाला भेडसावणाऱ्या समस्यांवर लवकरात लवकर उपाय शोधावेत. 

- वैभव सकपाळ

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा