शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

बैलांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, न्यायालयाने सरकार आणि पंचायत समितीला ठोठावला ३३ लाखांचा दंड! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:06 IST

खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने ग्रामपंचायत केसरदेसर जाटान आणि राजस्थान सरकारला दोषी ठरवले आहे. 

राजस्थानमधील बिकानेरमध्ये बैलांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. आसाराम असे या तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूसाठी न्यायालयाने सरकार आणि पंचायत समितीला जबाबदार धरले आहे. बिकानेर जिल्हा न्यायालयाचे पीठासीन अधिकारी अतुल कुमार सक्सेना यांनी आसारामच्या मृत्यूसाठी पंचायत समिती आणि राज्य सरकारला जबाबदार धरत ३३.२५ लाख रुपये दंड ठोठावला आहे. 

दोन बैलांच्या हल्ल्यात आसारामचा मृत्यू झाला. आसाराम हा बिकानेरमधील केसरदेसर जाटान गावचा रहिवासी होता. मृत्यूच्या घटनेनंतर आसारामचे नातेवाईक नुकसान भरपाईसाठी न्यायालयात गेले होते. दरम्यान, या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने ग्रामपंचायत केसरदेसर जाटान आणि राजस्थान सरकारला दोषी ठरवले आहे. 

सामान्य नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि भटक्या प्राण्यांसाठी व्यवस्था करणे, ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. जनावरांना गोशाळांमध्ये ठेवा किंवा सामान्य लोकांच्या संरक्षणासाठी सरकारी योजनांमध्ये व्यवस्था करा. मात्र, तुम्ही हे करू शकला नाही. त्यामुळे आसारामला आपला जीव गमवावा लागला, असे न्यायालयाने म्हटले आहे.

याचबरोबर, पंचायत समिती आणि राज्य सरकार यांना मृताच्या वारसांना संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे ३३.२५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. न्यायालयाने मृताची भरपाई म्हणून ३२ लाख ५२ हजार ६०० रुपये, जीवनसाथी भरपाई म्हणून ४० हजार रुपये, अंतिम संस्कारांसाठी १५ हजार रुपये आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी १५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCourtन्यायालय