शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

'महामारीतील तुमचा इंटरेस्ट कमी झालाच पाहिजे, पण महामारीचा तुमच्यातील होत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 16:33 IST

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळले

ठळक मुद्देमहाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळलेअभिनेता अतुल कुलकर्णीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका वाक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सध्याची परिस्थिती अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.

मुंबई - देशात गुरुवारी प्रथमच कोरोनाचे २० हजार ९०३ रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६ लाख २५ हजार ५४४ झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या पाच राज्यांमध्ये २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य राहिले नसल्याचे दिसून येते. देशात घोषित करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाचे गांभीर्य सर्वत्र दिसून येत होते. मात्र, हळू हळू कोरोना महामारीतील लोकांचा इंटरेस्ट, गांभीर्य कमी होताना दिसत आहे. 

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळले. आंध्रात रुग्णांची संख्या ८४५ ने वाढली. या सहा राज्यांतील रुग्णांची संख्या १७ हजारांच्या आसपास आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या तब्बल १ लाख ८६ हजार ६२६ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण जूनमध्ये वाढले आणि १ जून ते २ जुलै या काळात ४ लाख ३५ हजार जणांना संसर्ग झाल्याचे चाचण्यांतून दिसून आले. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. कारण, लोकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही. सरकारच्या सूचनांचं किंवा प्रशासनाच्या नियमांचं पालन नागरिकांकडून होताना दिसत नाही. 

अभिनेता अतुल कुलकर्णीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका वाक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सध्याची परिस्थिती अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. कोरोना महामारीबद्दल सध्या लोकांमध्ये गांभीर्य दिसत नसून देश अनलॉक झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर, लोकांमध्ये कोरोनाची भीतीही राहिली नसल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन अतुल कुलकर्णीने इंग्रजीतील एक वाक्य लिहिले आहे. महामारीतील आपला इंटरेस्ट कमी झालाच पाहिजे, पण महामारीचा तुमच्यातील रस कमी होणार नाही, असे वाक्य लिहित, द इकॉनॉमिस्ट या वृत्तपत्राचा संदर्भही अतुल कुलकर्णीने जोडला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात बोलताना, कोरोनासोबत जगायची आपली तयारी आहे, पण कोरोनाची तयारी आहे का आपल्याला सोबत घेऊन जगू द्यायची, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांचे हे वाक्य चर्चेचा विषय बनले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAtul Kulkarniअतुल कुलकर्णी