शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
4
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
5
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
6
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
7
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
8
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
9
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
11
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
12
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
13
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
14
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
15
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
16
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
17
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
19
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
20
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आपची बेदींविरुद्ध तक्रार

By admin | Updated: February 8, 2015 02:24 IST

विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करून भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरुद्ध शनिवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने कृष्णानगरस्थित विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करून भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरुद्ध शनिवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आयोगाला पाठविलेल्या पत्रात आपने किरण बेदी यांनी आज सकाळी शेकडो कार्यकर्त्यांसह दुचाकीवर रॅली काढल्याचा आरोप केला आहे. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडे प्रचाराचे साहित्य होते आणि ते मतदारांशी बोलले, असेही त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा ५ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता थंडावल्या होत्या. स्थिर सरकारची आशाया निवडणुकीनंतर राजधानीत स्थिर सरकार स्थापन होईल, अशी आशा दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी व्यक्त केली आहे. गेल्या एक वर्षापासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट आहे. निवडणुकीनंतर दिल्लीत स्थिर सरकार स्थापन होणार काय? असा प्रश्न विचारला असता मला अशी आशा आहे, असे ते म्हणाले. जंग यांनी मॉडेल टाऊन मतदार संघातील सिव्हिल लाईन्समध्ये सेंट झेव्हिअर्स सिनिअर सेंकडरी स्कूल मतदान केंद्रात मतदान केले. राष्ट्रपतींचे मतदान नाहीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानात भाग घेतला नाही. पण राष्ट्रपती भवनातील मतदान केंद्रावर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा मात्र घेतला. देशाचा राष्ट्रपती हा कुठल्याही एका राजकीय पक्षाचा नसतो. त्यामुळे आपण सार्वत्रिक अथवा विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)४दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या देखरेख पथकाने ४० लाख रुपये रोख आणि १ कोटी २६ लाख रुपये किमतीच्या मद्याच्या ५३,००० बाटल्या जप्त केल्या. याशिवाय आयोगाच्या चमूने मतदारांना बेकायदेशीरपणे लालूच दिल्याप्रकरणी ४४ गुन्ह्यांचीही नोंद केली. पेड न्यूजचीही ६० प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.मतदानावर बहिष्कार४आपल्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे विकास कार्य न झाल्याने नाराज झालेल्या नरेला मतदारसंघातील झंगोला गावामध्ये बहुतांश नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. ४अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार दुपारी १२.३० वाजेपर्यत या क्षेत्रातील एकूण नोंदणीकृत १,८०० मतदारांपैकी फक्त १९ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. नाराज मतदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.