नवी दिल्ली : भारताचा एकूण प्रजनन दर १.९ वर घसरला आहे, जो पुनरुत्पादनासाठी आवश्यक २.१ यापेक्षाही खाली आहे; पण तरीही युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीजच्या (यूएनएफपीए) सर्वेक्षणात बहुतेक भारतीयांनी सांगितले की, त्यांना मुलं हवी आहेत. मात्र, अनेक अडचणींमुळे ही इच्छा पूर्ण करता येत नाही. वर्ष १९९५ ते २०२२ दरम्यान सर्वाधिक घट किशोरवयीन (१५-१९ वर्षे) गरोदरपणात झाली, तर २०-२४ वयोगटातही मोठी घट झाली.
मुलं हवी आहेत असे ६१ टक्के पुरुष व ७० टक्के स्त्रियांनी सांगितले. त्यातील ९० % पेक्षा जास्त लोकांना मुलं हवीत; पण बहुतांश जणांना फक्त दोनच मुलं हवी आहेत.
किशोरवयीन व तरुण वयात गर्भधारणेचे प्रमाण कमी
किशोरवयीन जन्मदर
१९९५ >> १३०
२०२२ >> २० (प्रति १,००० स्त्रिया, वय १५-१९)
तरुण स्त्रियांचा जन्मदर
१९९५ >> २५०
२०२२ >> १५०(प्रति १,०००, वय २०-२४)
भारतीयांना मुलं हवी असण्यामागील मुख्य कारण आनंद आणि समाधान हे आहे. परंपरा, लिंग अपेक्षा किंवा कौटुंबिक दबाव याला जोडपी फारसे महत्त्व देत नाही.
पण अडथळेही खूप आहेत... आर्थिक, स्वत:चे घर, नोकरी
मूल नको असं म्हणणाऱ्या भारतीय दाम्पत्यांनी सांगितलेल्या अडचणीमध्ये आर्थिक, स्वत:चे घर आणि जबाबदारीचे अडथळे सांगितले.
यात ३८% आर्थिक अडचणी, २२% घर/निवासयोग्य जागेचा अभाव आणि २१% नोकरी नसणे/नोकरीची अस्थिरता.