शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

'आपल्याला लाज वाटायला हवी', बिहारमधील चिमुकल्यांचा मृत्युबाबत मोदींनी मौन सोडलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 15:57 IST

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीबिहारमधील चमखी बुखार या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, बिहारमधील रुग्णालयात लहान मुलांचा झालेला मृत्यू हा आपल्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून आरोग्यमंत्रीही पाठपुरावा करत असल्याचे मोदींनी म्हटले. 

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले. यामध्ये आतापर्यंत जवळपास सव्वाशेहून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 95 पेक्षा अधिक बालकांचे मृतदेह एकट्या मेडीकल कॉलेजमधून बाहेर काढण्यात आले. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक्यूट इन्सेफेलाइटीस सिंड्रोममुळे दररोज 8 ते 9 मुलांचा मृत्यू होत आहे. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनीदेखील मुजफ्फरपूरमधील मेडीकल कॉलेजला भेट दिली. त्याचवेळी निशा नावाच्या एका चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला होता.

सोशल मीडियावरही बिहारमधील चमखी बुखारवरुन सरकारला मोठ्या प्रमाणात धारेवर धरण्यात आले. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिखर धवनसाठी ट्विट करायला वेळ आहे. मात्र, बिहारमधील चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत एक अक्षरही मोदी करत नाही, असे नेटीझन्स विचारत होते. त्यातच, संसदेच्या सभागृहातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याचाच, उल्लेख करत मोदींनी बिहारमधील बालकांच्या मृत्युबाबत शोक व्यक्त करत, आपल्याला लाज वाटायला हवी असे म्हटले आहे. 

दरम्यान, लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांचे नावही आहे. 

टॅग्स :BiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलAES Diseaseएक्यूट कोरोनरी सिंड्रोम