शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
3
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
4
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
5
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
6
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
7
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
8
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
9
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
10
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
11
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
12
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
13
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
14
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
15
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
16
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
17
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
18
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
19
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
20
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

'आपल्याला लाज वाटायला हवी', बिहारमधील चिमुकल्यांचा मृत्युबाबत मोदींनी मौन सोडलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 15:57 IST

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीबिहारमधील चमखी बुखार या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, बिहारमधील रुग्णालयात लहान मुलांचा झालेला मृत्यू हा आपल्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून आरोग्यमंत्रीही पाठपुरावा करत असल्याचे मोदींनी म्हटले. 

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले. यामध्ये आतापर्यंत जवळपास सव्वाशेहून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 95 पेक्षा अधिक बालकांचे मृतदेह एकट्या मेडीकल कॉलेजमधून बाहेर काढण्यात आले. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक्यूट इन्सेफेलाइटीस सिंड्रोममुळे दररोज 8 ते 9 मुलांचा मृत्यू होत आहे. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनीदेखील मुजफ्फरपूरमधील मेडीकल कॉलेजला भेट दिली. त्याचवेळी निशा नावाच्या एका चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला होता.

सोशल मीडियावरही बिहारमधील चमखी बुखारवरुन सरकारला मोठ्या प्रमाणात धारेवर धरण्यात आले. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिखर धवनसाठी ट्विट करायला वेळ आहे. मात्र, बिहारमधील चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत एक अक्षरही मोदी करत नाही, असे नेटीझन्स विचारत होते. त्यातच, संसदेच्या सभागृहातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याचाच, उल्लेख करत मोदींनी बिहारमधील बालकांच्या मृत्युबाबत शोक व्यक्त करत, आपल्याला लाज वाटायला हवी असे म्हटले आहे. 

दरम्यान, लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांचे नावही आहे. 

टॅग्स :BiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलAES Diseaseएक्यूट कोरोनरी सिंड्रोम