शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

'आपल्याला लाज वाटायला हवी', बिहारमधील चिमुकल्यांचा मृत्युबाबत मोदींनी मौन सोडलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 15:57 IST

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनीबिहारमधील चमखी बुखार या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, बिहारमधील रुग्णालयात लहान मुलांचा झालेला मृत्यू हा आपल्यासाठी लाजीरवाणी बाब असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून आरोग्यमंत्रीही पाठपुरावा करत असल्याचे मोदींनी म्हटले. 

बिहारमधील मुझफ्फरपूर आणि आससापच्या परिसरात मेंदुज्वर (एईएस) या आजाराने थैमान घातले. यामध्ये आतापर्यंत जवळपास सव्वाशेहून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 95 पेक्षा अधिक बालकांचे मृतदेह एकट्या मेडीकल कॉलेजमधून बाहेर काढण्यात आले. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक्यूट इन्सेफेलाइटीस सिंड्रोममुळे दररोज 8 ते 9 मुलांचा मृत्यू होत आहे. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनीदेखील मुजफ्फरपूरमधील मेडीकल कॉलेजला भेट दिली. त्याचवेळी निशा नावाच्या एका चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला होता.

सोशल मीडियावरही बिहारमधील चमखी बुखारवरुन सरकारला मोठ्या प्रमाणात धारेवर धरण्यात आले. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिखर धवनसाठी ट्विट करायला वेळ आहे. मात्र, बिहारमधील चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत एक अक्षरही मोदी करत नाही, असे नेटीझन्स विचारत होते. त्यातच, संसदेच्या सभागृहातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याचाच, उल्लेख करत मोदींनी बिहारमधील बालकांच्या मृत्युबाबत शोक व्यक्त करत, आपल्याला लाज वाटायला हवी असे म्हटले आहे. 

दरम्यान, लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबै आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांचे नावही आहे. 

टॅग्स :BiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलAES Diseaseएक्यूट कोरोनरी सिंड्रोम