शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:19 IST

Rahul Gandhi Criticize Modi Government: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक झालेल्या युद्धविरामावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या मोहिमेंतर्गत भारताच्या संरक्षण दलांनी ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांना लक्ष्य केलं होतं. मात्र चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी १० मे रोजी युद्धविराम घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. आता याच युद्धविरामावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. तुम्हीतर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला. लढण्याची इच्छाशक्तीच दाखवली नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक झालेल्या युद्धविरामावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की,  काल येथे सॅम माणेकशॉ यांच्या एका विधानाचं उदाहरण दिलं गेलं. तेव्हा सॅम माणेकशॉ इंदिरा गांधी यांना म्हणाले होते की, आम्ही आता कारवाई करू शकत नाही. आम्हाला सहा महिन्यांचा  अवधी द्या. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांना पूर्ण वेळ दिला. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आमच्या संरक्षणमंत्र्यांनी काल सभागृहात सांगितले की, आम्ही १.३५ वाजता पाकिस्तानला सांगितले की, आम्ही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. हे आक्रमण नव्हतं. तसेच पुढेही कुठलं आक्रमण होणार नाही. तुम्ही ३० मिनिटांमध्येच पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. हे सांगितलं की, आमची लढण्याची इच्छाशक्ती नाही आहे. सरकारने वैमानिकांचे हातपाय बांधले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, सरकारने चूक केली आहे. आपलं कुणाशी भांडण झालं आणि आपण त्याला सांगितलं की, भावा आता ठीक आहे . आम्हाला भांडण नको आहे. आम्ही एक फटका मारला आहे. आता दुसरा मारणार नाही. येथे चूक लष्कराकडून नाही तर सरकारकडून झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण युद्ध थांबवलं, असं २९ वेळा सांगितलं आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये इंदिरा गांधी यांच्या तुलनेत ५० टक्के दम असेल तरी त्यांनी येथे डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत, असं सांगावं, असं आव्हानही राहुल गांधी यांनी दिलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसOperation Sindoorऑपरेशन सिंदूरCentral Governmentकेंद्र सरकार