शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:19 IST

Rahul Gandhi Criticize Modi Government: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक झालेल्या युद्धविरामावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या मोहिमेंतर्गत भारताच्या संरक्षण दलांनी ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांना लक्ष्य केलं होतं. मात्र चार दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी १० मे रोजी युद्धविराम घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. आता याच युद्धविरामावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. तुम्हीतर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला. लढण्याची इच्छाशक्तीच दाखवली नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक झालेल्या युद्धविरामावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की,  काल येथे सॅम माणेकशॉ यांच्या एका विधानाचं उदाहरण दिलं गेलं. तेव्हा सॅम माणेकशॉ इंदिरा गांधी यांना म्हणाले होते की, आम्ही आता कारवाई करू शकत नाही. आम्हाला सहा महिन्यांचा  अवधी द्या. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांना पूर्ण वेळ दिला. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आमच्या संरक्षणमंत्र्यांनी काल सभागृहात सांगितले की, आम्ही १.३५ वाजता पाकिस्तानला सांगितले की, आम्ही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. हे आक्रमण नव्हतं. तसेच पुढेही कुठलं आक्रमण होणार नाही. तुम्ही ३० मिनिटांमध्येच पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. हे सांगितलं की, आमची लढण्याची इच्छाशक्ती नाही आहे. सरकारने वैमानिकांचे हातपाय बांधले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, सरकारने चूक केली आहे. आपलं कुणाशी भांडण झालं आणि आपण त्याला सांगितलं की, भावा आता ठीक आहे . आम्हाला भांडण नको आहे. आम्ही एक फटका मारला आहे. आता दुसरा मारणार नाही. येथे चूक लष्कराकडून नाही तर सरकारकडून झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण युद्ध थांबवलं, असं २९ वेळा सांगितलं आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये इंदिरा गांधी यांच्या तुलनेत ५० टक्के दम असेल तरी त्यांनी येथे डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत, असं सांगावं, असं आव्हानही राहुल गांधी यांनी दिलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसOperation Sindoorऑपरेशन सिंदूरCentral Governmentकेंद्र सरकार