शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

प्रवाशांचा वेळ वाचणार, उबर टॅक्सी बुकिंगसह मेट्रो प्रवासाचाही पर्याय मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 08:54 IST

मेट्रोतून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवा उबरने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देमेट्रोतून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवा उबरने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.उबर टॅक्सी बुकिंगसह मेट्रो प्रवासाचाही पर्याय मिळणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहेदिल्लीतील एकूण 210 मेट्रो स्थानकांवर ही सेवा असणार आहे.

नवी दिल्ली - मेट्रोतून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवा उबरने मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उबर टॅक्सी बुकिंगसह मेट्रो प्रवासाचाही पर्याय लवकरच मिळणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. तसेच त्यामुळे मेट्रो स्थानकावर टोकन खरेदी करावे लागणार नाही. शिवाय मेट्रो पासचीही गरज नसेल. बारकोड स्कॅन केल्यावर मेट्रो स्थानकावर प्रवेश मिळणार आहे. 

स्थानकातून बाहेर पडतानाही तोच कोड स्कॅन करता येईल. आशियात अशी सोय असलेले दिल्ली हे पहिलेच शहर ठरणार आहे. स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्स कार्यक्रमात उबरचं मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खास्त्रोवशाही व दिल्ली मेट्रो रेल प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह यांनी या अभिनव उपक्रमाची घोषणा केली आहे. दिल्लीतील एकूण 210 मेट्रो स्थानकांवर ही सेवा असणार आहे. उबर व डीएमआरसीमध्ये त्यासंबंधी करार झाला आहे. 

पहिल्या दिवशी ही सेवा केवळ चार मेट्रो स्थानकांवर सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात काही दिवसांमध्ये 46 स्थानकांवर ही सेवा सुरू होईल. बोस्टन, शिकागो, वॉशिंग्टन डीसी, सॅन फ्रान्सिस्को, लंडन, पॅरिस व सिडनीनंतर आता दिेल्लीत ही सेवा असेल. उबर अ‍ॅपवर पब्लिक ट्रान्सपोर्टचा नवा पर्याय असणार आहे. प्रवासी लास्ट माईल पर्याय निवडू शकतील. कोणत्याही ठिकाणाहून प्रवास सुरू होईल, त्यानंतर मेट्रोने निश्चित स्थळी पोहोचता येईल. मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यास पुन्हा उबर टॅक्सीने प्रवास करता येईल. यालास लास्ट कनेक्टीव्हीटी असे डीएमआरसीने म्हटले आहे. 

उबरने भारतात एअर टॅक्सी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारशी बोलणी सुरू केली आहेत. काही दिवसांपूर्वी उबरचे हेड निखिल गोयल यांनी इकोनॉमिक्स टाइम्स या इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना ही माहिती दिली होती. उबरने मागील वर्षभरापासून भारत, जपान, फ्रान्स, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर उबर एअर प्रोजेक्ट लॉन्च करण्याचा प्रस्ताव दिला आहे. उबरचे एलिवेट हेड एरिक एलिसन यांनी उबर एअर टॅक्सी लॉन्चिंग करण्यासाठी साधारण 5 ते 10 वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. तसेच भारताची बाजारपेठ नवीन नवीन गोष्टी अंमलात आणण्यासाठी नेहमीच तयार असते असंही त्यांनी सांगितले. मात्र भारतात एअर वाहतूक सुरू करण्याबाबत सावधानता बाळगणं गरजेचे आहे. भारताची लोकसंख्या खूप असल्याने येथे काम करण्याचा वेगळा आनंद असतो असं निखिल गोयल यांनी सांगितलं होतं. 

 

टॅग्स :UberउबरMetroमेट्रोdelhiदिल्ली