शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

सदा सर्वकाळ लोकांना तुम्ही फसवू शकत नाही

By admin | Updated: February 7, 2017 05:45 IST

लोकांची दिशाभूल करणे मोदी सरकारला उत्तम जमते. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या. त्यातून निष्पन्न काय झाले?

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीलोकांची दिशाभूल करणे मोदी सरकारला उत्तम जमते. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या. त्यातून निष्पन्न काय झाले? नोटाबंदीच्या निर्णयानंतर किती काळा पैसा हाती आला? किती बनावट नोटा पकडल्या गेल्या? याची उत्तरे ना सरकारकडे आहेत ना रिझर्व बँकेकडे, असे सांगत आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक मुद्द्याचा आधार घेत, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवली. मंगळवारी लोकसभेत व त्यानंतर राज्यसभेत चर्चेचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या आरोप व टीकांना उत्तरे देतील. सदासर्वकाळ सर्व लोकांना मूर्ख बनवणे शक्य होणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय पूर्वतयारीविना राबवला. कोट्यवधी लोकांना त्याचा छळ सोसावा लागला. १२५ पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याबद्दल साधी दिलगिरीही हे सरकार व्यक्त करायला तयार नाही. रिझर्व्ह बँकेला गाफील ठेवूनपंतप्रधानांनी ८६ टक्के चलनाला कागदाचे तुकडे बनवले. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयाची कल्पना रिझर्व बँकेच्या फक्त दोन संचालकांना केवळ एक दिवस आधी देण्यात आली. महत्त्वपूर्ण संस्थांचे हे अवमूल्यनच नाही काय? ‘प्रेम माझ्यावर आणि विवाह मात्र दुसऱ्याशी’ अशी मोदी सरकारची वृत्ती आहे, या खरगेंच्या या वाक्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदींनाही हसू आवरले नाही. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, अनुराग ठाकुर, निशिकांत दुबेंसह बहुतांश सत्ताधारी खासदारांनी खरगेंच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणला मात्र त्यांना दाद न देता खडगेंनी जवळपास ७0 मिनिटे सरकारची हजेरी घेतली. अभिभाषणावरील आभार प्रस्तावाची सुरुवात पर्यटनमंत्री महेश शर्मांनी केला. ते म्हणाले की, भारताचे भविष्य बदलण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय सरकारने घेतला. काळया पैशांवर इतका मोठा प्रहार यापूर्वी देशात कोणीही केला नव्हता. पाकव्याप्त काश्मीरमधे सर्जिकल स्ट्राईक करण्यासह अनेक साहसी पाऊ ले सरकारने उचलली. असे निर्णय घ्यायला ५६ इंचाची छाती लागते. दोन वर्षांत ११ हजार गावांमधे वीज पोहोचली. जनधन खाती उघडून देशातल्या २७ कोटी लोकांना बँकिंग सिस्टिमचा भाग बनवले. संरक्षण व्यवस्थेत वन रँक वन पेन्शन प्रत्यक्ष लागू करण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवली.भाजपचे वीरेंद्रसिंग म्हणाले, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा बराच गवगवा सुरू आहे. प्रत्यक्षात असे घडले असते तर रब्बीच्या सर्व पिकांचे क्षेत्र यंदा वाढलेच नसते. राहुल गांधी आणि अखिलेश यादवांचे नाव न घेता दोघांच्या रोड शोची खिल्ली त्यांनी उडवली. तृणमूलच्या सौगत राय यांनीही सरकारच्या विविध निर्णयांवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आज सुरुवात झाली.