शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

सदा सर्वकाळ लोकांना तुम्ही फसवू शकत नाही

By admin | Updated: February 7, 2017 05:45 IST

लोकांची दिशाभूल करणे मोदी सरकारला उत्तम जमते. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या. त्यातून निष्पन्न काय झाले?

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीलोकांची दिशाभूल करणे मोदी सरकारला उत्तम जमते. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या. त्यातून निष्पन्न काय झाले? नोटाबंदीच्या निर्णयानंतर किती काळा पैसा हाती आला? किती बनावट नोटा पकडल्या गेल्या? याची उत्तरे ना सरकारकडे आहेत ना रिझर्व बँकेकडे, असे सांगत आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक मुद्द्याचा आधार घेत, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवली. मंगळवारी लोकसभेत व त्यानंतर राज्यसभेत चर्चेचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या आरोप व टीकांना उत्तरे देतील. सदासर्वकाळ सर्व लोकांना मूर्ख बनवणे शक्य होणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय पूर्वतयारीविना राबवला. कोट्यवधी लोकांना त्याचा छळ सोसावा लागला. १२५ पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याबद्दल साधी दिलगिरीही हे सरकार व्यक्त करायला तयार नाही. रिझर्व्ह बँकेला गाफील ठेवूनपंतप्रधानांनी ८६ टक्के चलनाला कागदाचे तुकडे बनवले. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयाची कल्पना रिझर्व बँकेच्या फक्त दोन संचालकांना केवळ एक दिवस आधी देण्यात आली. महत्त्वपूर्ण संस्थांचे हे अवमूल्यनच नाही काय? ‘प्रेम माझ्यावर आणि विवाह मात्र दुसऱ्याशी’ अशी मोदी सरकारची वृत्ती आहे, या खरगेंच्या या वाक्यावर सभागृहात उपस्थित असलेल्या पंतप्रधान मोदींनाही हसू आवरले नाही. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, अनुराग ठाकुर, निशिकांत दुबेंसह बहुतांश सत्ताधारी खासदारांनी खरगेंच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणला मात्र त्यांना दाद न देता खडगेंनी जवळपास ७0 मिनिटे सरकारची हजेरी घेतली. अभिभाषणावरील आभार प्रस्तावाची सुरुवात पर्यटनमंत्री महेश शर्मांनी केला. ते म्हणाले की, भारताचे भविष्य बदलण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय सरकारने घेतला. काळया पैशांवर इतका मोठा प्रहार यापूर्वी देशात कोणीही केला नव्हता. पाकव्याप्त काश्मीरमधे सर्जिकल स्ट्राईक करण्यासह अनेक साहसी पाऊ ले सरकारने उचलली. असे निर्णय घ्यायला ५६ इंचाची छाती लागते. दोन वर्षांत ११ हजार गावांमधे वीज पोहोचली. जनधन खाती उघडून देशातल्या २७ कोटी लोकांना बँकिंग सिस्टिमचा भाग बनवले. संरक्षण व्यवस्थेत वन रँक वन पेन्शन प्रत्यक्ष लागू करण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवली.भाजपचे वीरेंद्रसिंग म्हणाले, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा बराच गवगवा सुरू आहे. प्रत्यक्षात असे घडले असते तर रब्बीच्या सर्व पिकांचे क्षेत्र यंदा वाढलेच नसते. राहुल गांधी आणि अखिलेश यादवांचे नाव न घेता दोघांच्या रोड शोची खिल्ली त्यांनी उडवली. तृणमूलच्या सौगत राय यांनीही सरकारच्या विविध निर्णयांवर घणाघाती हल्ला चढवला. राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आज सुरुवात झाली.