शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

"काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी राहीला गरीब", जावडेकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 11:15 IST

BJP Prakash Javadekar And Congress Rahul Gandhi : केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींवर पलटवार केला आहे. 

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. कृषी कायद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. तसेच चीनच्या मुद्यावरून सवाल विचारणारे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाही राहुल गांधी यांनी टोला लगावला आहे. तसेच केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात "खेती का खून" नावाने एक बुकलेट जारी केलं आहे. यानंतर आता केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींवर पलटवार केला आहे. 

केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बुधवारी चर्चेची दहावी फेरी होणार आहे. "कोणत्याही परिस्थितीत ही चर्चा यशस्वी होऊ नये असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघावा अशी काँग्रेसची इच्छा नाही. काँग्रेसला खून या शब्दाबाबत जास्त प्रेम आहे. तुम्ही खेती का खून असं म्हणत आहात, पण तुम्ही देशाच्या विभाजनावेळी हत्येचा खेळ खेळला, त्यावेळी लाखो लोकांचा मृत्यू झाला, ती हत्या नव्हती का?" असा सवाल विचारत जावडेकर यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.

"काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे की, 4-5 परिवार देशावर हावी आहेत. पण असं नाही, देशावर आता कोणत्याही परिवाराची सत्ता नाही. देशावर 125 कोटी जनतेचं राज्य आहे आणि हे परिवर्तन मोदी सरकारमध्ये झालं असल्याचा टोलाही जावडेकर यांनी लगावला आहे. काँग्रेसने देशावर तब्बल 50 वर्षे राज्य केलं. तेव्हा एकाच परिवाराची सत्ता होती. आज देशाचा शेतकरी गरीब आहे तर तो कुणाच्या नितीमुळे? काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी गरीब राहीला. त्याच्या उत्पादनाला कधीच योग्य भाव दिला गेला नाही" असं देखील प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

‘’जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ’’, राहुल गांधींची बोचरी टीका

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चीनच्या विषयावरून राहुल गांधी यांनी खोटं बोलणं बंद करावं, असा सल्ला देत नड्डा यांनी काही प्रश्न विचारले होते. त्याबाबत राहुल गांधीना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जे. पी. नड्डा हे काय माध्ये शिक्षक आहेत का. ते कोण आहेत ज्यांच्यासाठी मी उत्तरं देत फिरू. मी देशातील शेतकरी, देशातील जनतेला उत्तरे देईन. आपला आवाज उठवत राहीन. मग मला कितीही विरोध झाला तरी चालेल. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टोला लगावला. पंतप्रधानांपेक्षा अधिक समज ही देशातील शेतकऱ्यांना आहे. काय चाललंय आणि काय नाही हे त्यांना समजतं. हेच सत्य आहे आणि यावरील एकमेव उपाय म्हणजे तीनही काळ्या कायद्यांना मागे घ्यावं, असे राहुल गांधी म्हणाले. ज्यावेळी यूपीएचं सरकार सत्तेवर होतं, तेव्हा या सरकारने शेतकऱ्यांचं लाखो कोटींचं कर्ज माफ केलं होतं. भट्टा परसोलचा विषयसुद्धा यूपीए सरकार सत्तेत असतानाच उपस्थित करण्यात आला होता, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसJ P Naddaजगत प्रकाश नड्डा