शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sudhanshu Trivedi Reaction: जो शब्द बोललोच नाही, त्याबाबत तुम्ही वाद घालताय; सुधांशू त्रिवेदींची शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 23:20 IST

अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवाजी महाराजांबाबतची त्रिवेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राजकारणात एक गोष्ट असते, काय बोललो गेले यापेक्षा जास्त महत्वाचे आहे कोण बोलले आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो, हिंदू, हिंदू धर्म आणि हिंदुत्वात आणि भारतीय इतिहासात हिंदुत्वाच्या सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अवमानना आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्याने स्वत:च्या बुद्धीबाबत विचार करावा, अशी टीका भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे. 

अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवाजी महाराजांबाबतची त्रिवेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जे लोक बोलत आहेत, हे लोक शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला मानतात का? हिंदवी स्वराज्य बनविण्याची शपथ घेतली त्याला मानता? यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या साम्राज्य़ाचे नाव हिंदूपतपातशाही होते, तुम्ही मानता? नाही मानत, अशा शब्दांत भाजपाच्या सुधांशु त्रिवेदींनी विरोधकांवर प्रश्न उपस्थित केले. 

 जो शब्द बोललाच नाही गेला, त्याबाबत तुम्ही वाद घालत आहात. लुटीयन्स दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने किती रस्ते आहेत. औरंगजेबाच्या संपूर्ण परिवाराच्या नावांवर रस्त्यांची नावे आहेत. बाबर रोड, हुमायू रोड, अकबर रोड, शाहजहा रोड, औरंगजेब रोड, तुम्ही दगडावर काय लिहिलं आणि पुस्तकांमध्ये औरंगजेबाची प्रशंसा व महानता लिहिली, अशी टीका त्रिवेदी यांनी केली.  

सुधांशू त्रिवेदी काय म्हणालेले?राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानानंतर एका वृत्तवाहिनीवर सुधांशू त्रिवेदी भाजपची बाजू मांडत होते. यातल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. 'सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. पण त्याकाळात अनेक जण प्रस्तावित फॉरमॅटमध्येच बाहेर निघण्यासाठी ब्रिटीशांना पत्र लिहायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाचवेळा पत्र लिहिली, याचा अर्थ काय झाला?,' असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं.

टॅग्स :BJPभाजपाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज