शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sudhanshu Trivedi Reaction: जो शब्द बोललोच नाही, त्याबाबत तुम्ही वाद घालताय; सुधांशू त्रिवेदींची शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 23:20 IST

अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवाजी महाराजांबाबतची त्रिवेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राजकारणात एक गोष्ट असते, काय बोललो गेले यापेक्षा जास्त महत्वाचे आहे कोण बोलले आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो, हिंदू, हिंदू धर्म आणि हिंदुत्वात आणि भारतीय इतिहासात हिंदुत्वाच्या सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अवमानना आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्याने स्वत:च्या बुद्धीबाबत विचार करावा, अशी टीका भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे. 

अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेत शिवाजी महाराजांबाबतची त्रिवेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जे लोक बोलत आहेत, हे लोक शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला मानतात का? हिंदवी स्वराज्य बनविण्याची शपथ घेतली त्याला मानता? यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या साम्राज्य़ाचे नाव हिंदूपतपातशाही होते, तुम्ही मानता? नाही मानत, अशा शब्दांत भाजपाच्या सुधांशु त्रिवेदींनी विरोधकांवर प्रश्न उपस्थित केले. 

 जो शब्द बोललाच नाही गेला, त्याबाबत तुम्ही वाद घालत आहात. लुटीयन्स दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने किती रस्ते आहेत. औरंगजेबाच्या संपूर्ण परिवाराच्या नावांवर रस्त्यांची नावे आहेत. बाबर रोड, हुमायू रोड, अकबर रोड, शाहजहा रोड, औरंगजेब रोड, तुम्ही दगडावर काय लिहिलं आणि पुस्तकांमध्ये औरंगजेबाची प्रशंसा व महानता लिहिली, अशी टीका त्रिवेदी यांनी केली.  

सुधांशू त्रिवेदी काय म्हणालेले?राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानानंतर एका वृत्तवाहिनीवर सुधांशू त्रिवेदी भाजपची बाजू मांडत होते. यातल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. 'सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. पण त्याकाळात अनेक जण प्रस्तावित फॉरमॅटमध्येच बाहेर निघण्यासाठी ब्रिटीशांना पत्र लिहायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाचवेळा पत्र लिहिली, याचा अर्थ काय झाला?,' असं वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं.

टॅग्स :BJPभाजपाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज