शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: “यूपीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही”; योगी सरकारचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 07:57 IST

केंद्र सरकारनेही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची नोंद नसल्याचा दावा केला होता.

लखनऊ: कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा तडाखा बसला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले. ऑक्सिजनची कमतरता हा मुद्दा त्यावेळी चांगलाच गाजला होता. देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील ऑक्सिजन कमतरतेमुळे रुग्णांचे खूप हाल झाल्याचे दिसले. यातच आता उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा योगी आदित्यनाथ सरकारने केला आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, एका प्रश्नाला उत्तर देताना योगी सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे. विधान परिषदेत काँग्रेसचे सदस्य दीपक सिंह यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पूर्ण उत्तर प्रदेश राज्यात किती मृत्यू झाले, याविषयीचा प्रश्न विचारून राज्य सरकारकडे माहिती मागितली होती. या प्रश्नाला उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांनी लेखी उत्तर दिले.

ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असे लेखी उत्तर दिले आहे. तसेच जर ऑक्सिजन कमतरतेमुळे मृत्यू झाला असेल, तर वाराणसी, गोरखपूर जनपद-लखनऊ येथे त्याची संख्या किती होती, यासंदर्भात पटलावर माहिती ठेवावी, असे जोड प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नसल्यामुळे पुढील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रश्न येत नाही, असेही जय प्रताप सिंह यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. 

दरम्यान, भारतात यावर्षीच्या एप्रिल ते जून महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळाला. या कालावधीत हजारो कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता, लसींचा अपुरा पुरवठा, रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा यांमुळे देशात हाहाःकार माजला होता. या पार्श्वभूमीवर सर्व विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. केंद्र सरकारनेही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची नोंद नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर केंद्रावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ