शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Coronavirus: “यूपीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही”; योगी सरकारचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 07:57 IST

केंद्र सरकारनेही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची नोंद नसल्याचा दावा केला होता.

लखनऊ: कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा तडाखा बसला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले. ऑक्सिजनची कमतरता हा मुद्दा त्यावेळी चांगलाच गाजला होता. देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील ऑक्सिजन कमतरतेमुळे रुग्णांचे खूप हाल झाल्याचे दिसले. यातच आता उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा योगी आदित्यनाथ सरकारने केला आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, एका प्रश्नाला उत्तर देताना योगी सरकारने यासंदर्भात माहिती दिली आहे. विधान परिषदेत काँग्रेसचे सदस्य दीपक सिंह यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पूर्ण उत्तर प्रदेश राज्यात किती मृत्यू झाले, याविषयीचा प्रश्न विचारून राज्य सरकारकडे माहिती मागितली होती. या प्रश्नाला उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह यांनी लेखी उत्तर दिले.

ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू नाही

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असे लेखी उत्तर दिले आहे. तसेच जर ऑक्सिजन कमतरतेमुळे मृत्यू झाला असेल, तर वाराणसी, गोरखपूर जनपद-लखनऊ येथे त्याची संख्या किती होती, यासंदर्भात पटलावर माहिती ठेवावी, असे जोड प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, ऑक्सिजन कमतरतेमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नसल्यामुळे पुढील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रश्न येत नाही, असेही जय प्रताप सिंह यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. 

दरम्यान, भारतात यावर्षीच्या एप्रिल ते जून महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळाला. या कालावधीत हजारो कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता, लसींचा अपुरा पुरवठा, रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा यांमुळे देशात हाहाःकार माजला होता. या पार्श्वभूमीवर सर्व विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. केंद्र सरकारनेही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची नोंद नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर केंद्रावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ