शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा सर्वात आधी लागू करणार, योगी सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 13:22 IST

उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.

लखनऊ : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर संपूर्ण देशात या कायद्याला विरोध होत आहे. यातच केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारपासून हा कायदा देशात लागू केला असून, याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी केल्यानंतर हा कायदा देशात पहिल्यांदा उत्तर प्रदेशात लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.

देशात सर्वात आधी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आम्ही लागू करणार आहोत, असे योगी सरकारमधील मंत्री आणि प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी शनिवारी सांगितले. यासंदर्भातील अधिसूचना जारी झाल्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे डिटेल्स राज्याला मिळतील, त्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणारे सर्वात आधीचे राज्य उत्तर प्रदेश असणार आहे, असे सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले. दुसरीकडे, योगी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तानमधून आलेल्या शरणार्थींची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 2014 पासून जे लोक राहत आहेत, अशा लोकांच्या नावांची यादी तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सरकारने यासंबंधी अद्याप कोणताही लिखित आदेश जारी केला नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी शरणार्थींची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. पिलीभीत जिल्हा प्रशासनाने यासंबंधी आकडे सरकारकडे पाठविले आहेत.   

पिलीभीत जिल्ह्यात पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले शरणार्थी विविध भागात घरे बांधून मोठ्या संख्येने राहत आहेत. तालुका स्तरावर जाऊन अधिकारी शरणार्थींची गणना करत आहेत. आतापर्यंत जवळपास 37 शरणार्थींची माहिती गोळ्या करण्यात आली आहे, ज्यांना नागरिकता दिली जाणार आहे. तसेच,ही माहिती शासनाला पाठविण्यात आल्याचे येथील जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांनी सांगितले. 

(नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मोठे विधान, म्हणाले.... )

( केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू)

(सीएए, एनआरसी रद्द करा; ममता बॅनर्जी यांची मोदींकडे मागणी)

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक